• -100%

    क्रांतिसुक्ते: राजेर्षी छत्रपती शाहू

    0

    क्रांतिसूक्ते: राजर्षी शाहू छत्रपतींच्या भाषणांचा टिपा-टिप्पणीसह चिकित्सक अभ्यास

    राजर्षींच्या या ‘क्रांतिसूक्ता’ स आजच्या स्वातंत्र्योत्तर काळातील संदर्भ काय, याचाही विचार केला पाहिजे. महाराजांनी ज्यासाठी निर्धाराने झुंज दिली त्या गोष्टी आज पूर्णांशाने साकार झालेल्या नसल्या तरी त्या दिशेने फार मोठी प्रगती झाले आहे हे नाकारता येणार नाही. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामधील अनेक कर्तृत्वसंपन्न व्यक्ती राजकारणापासून शिक्षणापर्यंतच्या सर्व क्षेत्रांत आपल्या कृतीधृतीने चमकत आहेत. तथापि आपला समाज एकरस आणि एकजीव व्हावा हे राजर्षींचे स्वप्न तेवढ्या प्रमाणात साकार व्हायचे आहे. वाट मोठी आहे; हिमतीने चाल जरूर आहे. राजर्षी आहू छत्रपतीना अभिप्रेत असळेली सर्वकष क्रांती पूर्णत्वाने अजून व्हायची आहे. ‘श्रीशाय जनतात्मने’ ची प्रकर्षाने वानवा आहे. याचे तात्पर्य काय ते एवढेच आहे.

    प्रस्तुत संग्रहात डॉ. भोसले यांनी राजर्षींची मराठी भाषणे तेवढी संगृहीत केली आहेत. राजर्षींच्या इंग्रजी भाषणांचा वेगळा संग्रह  A Royal Philosopher Speaks  या सुरेख मथळ्याने सिद्ध झाला आहे. प्रा. भोसले यांनी ‘क्रान्तिसूक्ते’ मध्ये राजर्षींची मराठी भाषणे विषयवार विभागणी करून ती छापली आहेत. डॉ. भोसले यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेले “टिपा आणि टिप्पणी’ हे सदर आजच्या अभ्यासकांना फार उपयुक्त होईल. त्यावरून डॉ. भोसले यांच्या संपादनकुडालतेची उत्तम साक्ष पटते. या कार्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. राजर्षींच्या भाषणांचा असा हा सुंदर संग्रह सर्वांच्या आदरास पात्र होईल यात शंका नाही.

    नागपूर वि. भि कोलते

    Digital Book

    Original price was: ₹175.00.Current price is: ₹0.00.
  • -100% छत्रपती

    छत्रपती शिवाजी महाराज

    1

    निवेदन

    लोकोत्तर व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो कधीही पुरेसा आणि समाधानकारक असत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अशा व्यक्तींपैकी एक होते.

    शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांनी घडविलेला इतिहास हा केवळ मराठी भाषा असलेल्या अभ्यासकांचा-सृजनशील लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला नाही तर इतर भारतीय भाषांतील अभ्यासकांच्या, लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला आहे.

    अशा या लोकोत्तर पुरुषाच्या जीवनाचा व त्यांनी घडविलेल्या इतिहासाचा मोजक्या पण नेमक्या  शब्दांत परिचय व्हावा म्हणून श्रीशिवाजी महाराजांवर एक छोटेखानी चरित्रग्रंथ लिहून देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने डॉ. प्र. न. देशपांडे यांना केली. “शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली; न्यायदानात निःस्पृहता दर्शविली; गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱयांना मुलाहिजा न ठेवता समज दिली; पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले; सर्व धर्माना समान लेखले; साधुसंतांचा यथोचित आदर केला; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱया महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरुष होता.” हा या चरित्रग्रंथाचा डॉ. प्र. न. देशपांडे यांनी केलेला समारोप वाचल्यानंतर त्यांनी आमची विनंती सन्मानित केल्याचे स्पष्ट होते. डॉ. प्र. न. देशपांडे यांचे आम्ही आभारी आहोत.

    – रा. रं. बोराडे

    मुंबई अध्यक्ष

    दि. १६ जुलै, २००२ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

    Digital Book

    Original price was: ₹45.00.Current price is: ₹0.00.
  • -100% तंट्या-भिल्ल

    जननायक तंट्या भिल्ल

    0

    एकशे  पंचवीस वर्षापूर्वी आपल्याकडे इंग्रजांचा अंमल होता. आजच्या जळगाव-धुळे जिल्ह्यांस त्या काळात खानदेश म्हणत. खानदेझ्ञाला लागून वरच्या बाजूने सातपुडा डोंगराची रांग आहे. याला लागून होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिद्यांचा पूर्व निमाड हे भाग होते. खानदेश, होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिद्यांचा पूर्व निमाडची हद्द जळगाव जिल्ह्यातील पालजवळ मिळत होती. त्या भागात तंट्या भिल्लाचे गाव होते. माउंटअबूपासून सुरू होणारा विध्य, सातपुडा आणि बस्तरपर्यंतच्या डोंगराळ भागात आदिवासींची मोठी वस्ती आहे. यातच भिल्लांची मोठी संख्या आहे.

    मराठेझाहीचा १८१८ साली अस्त झाला. परंतु त्या काळात सातपुडातील बहादुर भिल्लांनी अनेक वर्षे गनिमी काव्यानं इंग्रजांशी झुंज दिली. सातपुडा, सातमाळा, अजिंठ्याच्या डोंगरांतील अनेक भिल्ल नायकांनी इंग्रजांशी प्रखर लढा दिला. ह्यात सातमाळातील भागोजी नाईक, सातपुडातील कजरसिंग नाईक, भिमा नाईक आणि तंट्या भिल्लाचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काही सोनेरी पाने आहेत.

    भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाप्रमाणेच या आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहासही महत्त्वाचा  आहे. बलाढ्य ब्रिटिझञ सत्तेला अकरा वर्ष सळो की पळो करणारा तंट्या भिल्ल हा

    ज्या काळात होळकर, निजाम, झिंदे अन्‌ इतर संस्थानिक ब्रिटिझ सत्तेची हुजरेगिरी करण्यात मशगुल होते, त्या काळात हा लोकविलक्षण नायक जनाधारावर झुंजत होता. अकरा वर्ष ब्रिटिश सत्तेच्या तोंडचे पाणी तंट्याने पळविले. त्याची एकाकी झुंज आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातील एक सोनेरी पान आहे. 

    Digital Book

    Original price was: ₹45.00.Current price is: ₹0.00.
  • -100% नामदेव गाथा

    नामदेव गाथा

    0

    श्रीभक्‍त शिरोमणी संत नामदेव महाराजांची भक्‍तिज्ञाननिष्ठा आणि अपूर्व व्यक्तिमत्त्व

    महाराष्ट्रीय संतमंडळींत श्री नामदेव महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांची श्रीविठ्ठलेशावरील भक्‍ती निस्सीम व पराकोटीची होती, हे महाराष्ट्रांत सर्वश्रुत आहे. श्रीज्ञानराज माउलींनी महाराष्ट्रांत भागवत धर्माचा अर्थात वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि वारकरी भक्‍तिमार्गाला जे तत्त्वज्ञानाचे भक्‍कम अधिष्ठान दिले त्या संप्रदायाचा प्रचार व प्रसार श्रीनामदेव महाराजांनी येथे धडाडीने केला, हे सर्वांना ठाउकी आहे; पण हा प्रसार त्यांनी केवळ या महाराष्ट्रापुरता सीमित केला नाहीं ; तर तो उत्तर भारतांतही केला. श्रीविठ्ठलाला सोडून पंढरपुराबाहेर तीर्थयात्रेलाही जाण्यास तयार नसलेल्या श्रीविठ्ठलाच्या एकनिष्ठ भक्ताने गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश अशा अनेक प्रांतांतील शहरांत व खेड्यांत भागवत धर्माची पताका फडकावली ; एवढेच नव्हे तर आपल्या उत्तर आयुष्यांत ‘पंजाब’ ही आपली कर्मभूमी ‘ व दीड तपाहून अधिक काळ तेथे राहून, त्या प्रांतांत व आसमंतातील प्रदेशांत भागवत धर्माच्या “भक्‍ति-ज्ञानाची गंगा” नेऊन परकीय स्वाऱ्या व आक्रमणांनीं होरपळून निघालेल्या जनतेला  “अमृत-संजीवनी” दिली, तेथील जनतेत नवचैतन्य ओतले आणि स्वधर्म रक्षणाकरिता सिद्ध राहण्याची केवढी व कशी तयारी केली, याची महाराष्ट्रांत घ्यावी तेवढी दखल अद्यापिही घेतली नाहीं. पंढरीच्या वाळवंटांतील विठ्ठल नामाचा गजर आणि भागवत धर्माच्या “ भक्ति-ज्ञाना ” चे रहस्य श्रीनामदेव महाराजांनीं उत्तरेतही कसे गाजविले, हे कळून येते ; पण याचा उद्घोष महाराष्ट्रांत जितका व्हावा तितका अद्यापि झालेला नाहीं. ती माहिती व श्रीनामदेव महाराजांचे संपूर्ण ‘व्यक्तिमत्त्व’ व कार्य ‘ आपल्यास येथे थोडक्यात पाहावयाचे आहे.

    श्रीपुंडलिक रायांनीं श्रीविठ्ठलाला विटेवर उभे केले; त्या दैवताचा संप्रदाय व वारी श्रीज्ञानदेव महाराज व श्रीनामदेव महाराज यांच्या उदयापूर्वी सुमारे दोनशे-तीनशे वर्षे तरी असावी असे इतिहास संशोधकांचे मत आहे. त्यांच्यापूर्वी श्रीमदाधशंकराचार्य यांनी एक “ श्री पांडुरंगाष्टक ” लिहिले आहे; ते सर्वजन प्रसिद्ध आहे. त्याचेळी आजच्या संप्रदायाची शान, मान व प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी महानुभाव व लिंगायत पंथही आपल्या संप्रदायाचा प्रचार करीत होते. ते दोन्हीही पंथ अवैदिक असल्याने व वैदिक तत्त्वज्ञानाची त्यांना बैठक नसल्याने शिवाय महानुभाव पंथांत त्यांच्या लिपीची दुर्बोधता व विचाराची गुप्तता असल्याने जनमानसावर त्यांची छाप पडत नसे. हेमाद्री, रोप देवासारखी पंडित मंडळी संस्कृत धर्मग्रंथावर संस्कृत भाषेतच टीका करीत अगर ग्रंथरचना करीत ; ह्यामुळें प्राकृत जनांना त्याचा काही उपयोग नव्हता. आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारा व जनमानसांत चैतन्याचा संचार करणारा असा जोमदार पंथ उदयास आला नव्हता; ही उणीव भरून काढणारा “भागवत धर्माच्या भक्ति-ज्ञानाचा दीप श्रीसंत ज्ञानदेव आणि श्रीसंत नामदेव यांनी उजळला आणि जनतेला अंधारातून प्रकाशात-ज्ञान प्रकाशात आणिले.” 

    Original price was: ₹420.00.Current price is: ₹0.00.
  • -100%

    पूज्य स्वामी रामानंदतीर्थ यांची दैनंदिनी

    0

    पी. व्ही. नरसिंह राव , 9, Motilal Nehru Marg,

    P. V. Narsimha Rao New Delhi 110011

    दिनांक : १ फेब्रुवारी २०००.

    श्री. वि. पां. देऊळगावकर यांनी संपादित केलेली “पू. स्वामी रामानंदतीर्थ यांची दैनंदिनी” स्वामीजींच्या विचारांचा, प्रगल्भ चिंतनाचा अमूल्य ठेवा आहे. या दैनंदिनीत स्वामीजींच्या शालीन व अष्टपैलू

    व्यक्तिमत्त्वाचा, खंबीर नेतृत्त्वाचा, त्यांच्या अंतरंगाचा आणि प्रामुख्याने निःस्वार्थ बुद्धीने, देशप्रेमाने प्रेरित होऊन केलेल्या विविध कार्याचा आढावा आहे. म्हणूनच ही दैनंदिनी वाचकांना उच्च विचारसरणीसाठी

    प्रेरणादायी तर ठरेलच, परंतु तरुण पिढीत, नवयुवकांत समर्पणाची भावना निर्माण करून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणू शकेल याची मला खात्री आहे.

    – दिनांक १ फेब्रुवारी २०००. पी. व्ही. नरसिह राव

    Original price was: ₹60.00.Current price is: ₹0.00.
  • -100% बहिणाईची गाणी एक अभ्यास

    बहिणाईची गाणी एक अभ्यास

    0

    एका अशिक्षित स्त्रीची गांवळळ भाषेतील गाणी म्हणून कित्येक वर्षे बहिणाईंची कविता उपेक्षितच राहिली. पण देह कष्टांत बुडालेला असताना स्वतःच्या नश्निबी आलेले वैधव्य, वडिलमुलाचे अपंगत्व आणि एकुलत्या एका लाडक्या मुलीला सासरी असणारा जाच या तिहेरी दुःखाचा सलही उरी दडपावा लागे. या कष्टांवर आणि दुःखावर उतारा म्हणजे त्यांच्या काव्याने त्यांना दिलेली आयुष्यभराची साथ! कणखर आत्मविश्वासाने जीवनांतील समर प्रसंगांशी त्यांनी दिलेली टक्कर हे त्यांचे लौकिक कर्तृत्व तर खरेच पण निर्मितीची यत्किंचितही जाण नसता त्यांनी चिरंजीव केलेले त्यांचे काव्य हे त्यांचे त्याहूनही मोठे अविनाशी असे वाड्मयीन कर्तृत्व होय. केवळ कर्तव्य

    बुद्धीने त्यांनी व्यावहारिक कर्तृत्व गाजविले तद्वतच केवळ विरंगुळा म्हणून त्यांचे काव्य निर्माण झाले. त्यांच्या कविता संग्रहाची प्रथमावृत्ती प्रसिद्ध झाली, तीही त्यांच्या मृत्यूनंतर. म्हणजेच ज्या सहजपणाने त्यांची कविता जन्मली, त्याला कर्तृत्वाच्या अहंकाराचा हलकासाही स्पर्श न होता ही निसर्गकन्या आपला अमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवून अनंतात विलीन झाली.

    Original price was: ₹150.00.Current price is: ₹0.00.
  • -100% Dhondo keshav karve

    महर्षी धोंडो केशव कर्वे

    0

    अण्णासाहेबांना खंत होती, ती ही की स्वातंत्र्यानंतर समता आलेली नाही. समता आल्याशिवाय स्वातंत्र्याची खरी गोडी चाखता येणार नाही, असे ते म्हणत. महर्षी कर्वे यांनी कधीही तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला नाही किंवा लोकांना कोणता उपदेश केला नाही. कर्वे यांचे कार्य हाच कर्वे यांचा संदेश होता. ‘आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण झाडापर्यंत तरी जाईल’ या वचनाप्रमाणे कर्वे कार्य करीत राहिले.

    कर्वे यांच्या थोरवीबद्दळ आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ‘मी कोण आहे’ असा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला आणि त्याचे वस्तुनिष्ठ उत्तर स्वतःच शोधून काढले. म्हणूनच ते म्हणतात-“मी समाजकार्याला सर्वस्वी वाहून घेतले नाही. संसारी माणूस व संन्यासी वा त्यागी माणूस या दोघांच्या मधला मार्ग मी स्वीकारला. मी संसार नेटका केला नाही. कसाबसा करीत राहिलो. अजूनही करीत आहे. कुटुंबासाठी घरदार किंवा द्रव्यसंचय मी केला नाही. जरुरीपुरतेच वैयक्तिक व कौटुंबिक स्वार्थाकडे लक्ष देऊन बाकीचे सामर्थ्य व उर्वरित द्रव्य लोकहिताच्या कामी खर्चणे हा माझा स्वभाव बनला आहे.”स्वतः विषयीची वस्तुनिष्ठ जाणीव व स्वतःचे यथार्थ मूल्यमापन थोड्याच लोकांना करता आले. महर्षी कर्वे यांनी असे मूल्यमापन स्वतः केले.

    धर्म, नीतिशास्र आणि तत्त्वज्ञान यासंबंधी त्यांचे विचार पुरोगामी होते. त्यांचे सर्व आचरण धर्माधारित होते. हा धर्म कोणता? सद्‌विचारधर्म. अण्णासाहेबांनी धर्मविचारात आणि कर्माचरणात कर्मकांडाळा कधीच स्थान दिले नाही. त्यांचा मानसिक पिंड एखाद्या संन्याशासारखा अविचल आणि निर्विकार होता. 

    Original price was: ₹35.00.Current price is: ₹0.00.
  • -100% महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे

    महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे (इ.स.१८१८ – १८८४)

    0

    संक्षिप्त प्रस्तावना 

    विषयावरील प्रसिद्ध व अप्रसिद्ध साधनांची माहिती अभ्यासुंसाठी देत आहे. महाराष्ट्रारात इंग्रजी सत्ता आल्यानंतर म्हणजे १८१८ पासून १८८५ पर्यंत ठिकठिकाणी सशस्त्र लढे झाले. त्यांत १८५७ चा लढा सर्वांत मोठा होता. त्या अगोदर खानदेशातील भिल्ल, पुणेसाताऱ्याकडील रामोशी यांच्या ७/८ वर्षे सतत चाललेल्या लढ्यांनी इंग्रजांना त्रस्त केले. कित्तुरचे बंड, सावंतवाडी, कोल्हापूर येथील गडकऱ्यांचे लढे हेही सशस्त्र होते. ब्रिटीशांनी हेही लढे वेळीच निपटून काढले. १८५७ साली कोल्हापूर, सातारा, मुंबई, नागपूर, खानदेश, नाशिक, औरंगाबाद, जमखिंडी, सुरपूर या ठिकाणी सशस्त्र लढे झाले. तेथील एतद्देशिय सैनिकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध हे सशस्त्र लढे केले. ह्या लढ्यांच्या इतिहासाची साधने शोधून प्रसिद्ध करण्यासाठी त्यावेळचे केंद्रिय शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांच्या आध्यक्षतेखाली इतिहास तज्ञांची एक समिती नेमली होती. त्या समितीकडे १८५७ च्या इतिहासाच्या लेखणाचे काम सोपविण्यात आले, तसेच केंद्रशासनाने मुबंई, मध्येप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब इत्यादी सर्व राज्यांना राज्यस्तरीय इतिहास समित्या नेमण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रत्येक राज्याने इतिहास समित्या नेमल्या. त्यावेळच्या मुंबई सरकारने जी इतिहास समिती नेमली होती त्या समितीने मुंबई दप्तरखान्यातील ह्या विषयावरील कागदपत्रे तपासून “सोर्स मटिरियल फॉर द हिस्टरी ऑफ फ्रीडम मोव्हमेंट इन इंडिया”नावाचा १८१८ ते १८८५ या कालखंडातील अप्रसिद्ध कागदपत्रांचा खंड प्रसिद्ध केला. ही सर्व कागदपत्रे पूर्वी कॉन्फीडेन्सीयल म्हणजे गुप्त होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शासनाने त्यांची गुप्तता काढून टाकली. या रेकॉर्डमधून सरकारी दप्तरखान्यातील हस्तलिखित ग्रंथ विशेषतः पोलिटिकल डिपार्टमेंटचे व्हॉल्यूम्स तसेच पुणे येथील दप्तरखान्यातील पत्रव्यव्हार ही निरनिराळ्या वेळच्या लढेाची माहिती पुरवितात.  नागपूर लढ्याच्या माहितीसाठी श्री. या. मा. काळे यांचा नागपूर प्रांताचा इतिहास व वऱ्हाड प्रांताचा इतिहास तसेच नागपूर रेसिडेन्सी कॉरस्पॉडन्स्‌ भाग ३ हे उपयोगी आहेत.  इनाम कमिशन स्थापून इंग्रज सरकारने इनामदारास कसे लुबाडले याची माहिती “मुंबई इलाख्यातील इनाम कमिशन खात्यातील गैर इन्साफ”या सन १८५९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांत मिळते. लोकहितवादींचे लेखसंग्रहही या बाबतीत खूप माहिती देतात. 

    महाराष्ट्रातील व्यापर धंदे इंग्रजांनी कसे नष्ट केले या संबंधीची माहिती पुणे येथील डेक्कन कमिशनर्स रेकॉर्डस्‌, सिलेक्शन ऑफ पेपर्स फ्रॉम द रेकॉर्डस ऑफ इंडिया हाऊस, व्हॉ. ३, ४, १८३१- ३२ चे पार्लमेंटरी पेपर्स चॅप्लीन व एल्‌ फिन्स्टनचे रिपोटर्स, मुजुमदारकृत पेशवाईनंतरचा पुण्याचा इतिहास इत्यादी प्रसिद्ध अप्रसिद्ध साधने देतात. 

    भिल्लांनी १८१८ ते १८३१ पर्यंत सशस्त्र उठाव करून ब्रिटीशांना हैराण केले होते. कित्तूरच्या उठावाची माहिती १८२४ ते १८३० या कालखंडातील पोलिटिकल डिपार्टमेंटचे व्हॉल्यूमस्‌ देतात. रामोजी  पुणे- सातारा जिल्याह्यातील रामोशांनी १८२४ ते १८३१ पर्यंत इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करून इंग्रजांस जेरीस आणले. रामोशांच्या बंडातील प्रमुख उमाजी नाईक यास ज्या कॅ्टन मॅकिन्टॉशने पकडले त्याने रामोशांचा इतिहास इंग्रजीमध्ये लिहून ठेवलेला आहे. तसेच त्या त्या वर्षीच्या पॉलिटिकल डिपार्टमेंटच्या व्हॉल्यूममध्ये या रामोशांच्या ठिकठिकाणच्या उठावांची माहिती सापडते. सावंतवाडी व कोल्हापूर येथील गडकऱ्यांनी केलेल्या उठावांची माहिती त्या त्या वर्षीच्या पोलिटिकल डिपार्टमेंटच्या व्हॉल्यूममध्ये तसेच कोल्हापूर व पुणे येथील दप्तरखान्यात सापडते.  १८५७ मध्ये महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी एतद्देशीय सैनिकांनी जे सहस्त्र उठाव केले त्याची माहिती मुंबई दप्तरखान्यातील पोलिटिकल डिपार्टमेंट व्हॉल्यूममध्ये सापडते.  

    १८५७ च्या अयशस्वी उठावानंतर महाराष्ट्रात दोन दशके सर्वत्र सामसुम झाल्यासारखे वटले. पण  दुष्काळ आणि साथीचे रोग यांनी थेमान घातल्यामुळे वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे शुर रामोशी सहकारी यांनी १८७९ मध्ये सशस्र उठाव केला. वासुदेव बळवंत फडके पकडले गेले. त्यांना १८८० च्या सुरूवातीस एडन येथे दीर्घमृदतीची सजा भोगण्यासाठी पाठण्यात आले. तेथेच हा विरपुरुष १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यूच्या स्वाधीन झाला.

    डॉ. वि. गो. खोबरेकर

    Digital Book

    Original price was: ₹206.00.Current price is: ₹0.00.
  • -100%

    मुंबईचा वृत्तांत

    0

    प्रस्तुत ग्रंथ : मुंबईचा वृत्तांत

    मुंबईविषयीचे दुसरे पुस्तक म्हणजे मुंबईचा वृत्तांत. हे ‘प्राचीन आणि अर्वाचीन वर्णनात्मक नकाशासह’ बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे यांनी लिहिले आणि निर्णयसागर छापखान्यात छापून १८८९ मध्ये प्रसिद्ध केले. आपल्यापुढील कार्याचा त्यांना योग्य अंदाज होता.

    ज्या देशाचा  किंवा प्रान्ताचा इतिहास लिहावयाचा, त्याची पूर्ण माहिती ग्रंथकारास असली पाहिजे; तेथींल अनेक वयोवृद्ध व अनुभवशीर अशा गृहस्थांचा त्याच्याशीं परिचय असला पाहिजे, व त्याने त्या कामी साधनीभूत अशा अनेक ग्रंथाचे अवलोकन केलें पाहिजे. इत्यादी साधनांपैकी आम्हापाशी एकही पुरें साधन नसतां आम्ही हें धाडसाचे आणि त्यांत मुंबईसारख्या वैभवशाली शहराचा वृत्तांत लिहिण्याचे काम हातीं कां घेतलें असा प्रश्‍न साहजिक उत्पन्न होईल. होय. प्रश्‍न अगदीं बरोबर आहे. आह्मींही पूर्ण जाणत आहों की, हें काम आमच्या शक्‍तीपलिकडे आहे हें खचीत. तरी पण, यथाशक्ती प्रयत्न करून जी अल्पस्वल्प माहिती मिळविली ती तशीच दाबून न ठेवितां लोकांपुढे आणावी, बरीवाईट कशी काय असेल तशी त्यांचे ते पाहून घेतील; आणि आमचे दोष आम्हांस दाखवितील.

    असे लेखकद्वयीने प्रस्तावनेतच लिहून ठेवले आहे. ज्या पुस्तकांची त्यांनी मदत घेतली त्यात म्याक्लिन्‌स गाईड टु बॉम्बे, बुक ऑफ बॉम्बे, मुंबईचे वर्णन, राऊंड अबाऊट बॉम्बे; मुंबईनो बहार (भाग १ला), बिंबाख्यान इत्यादींचा समावेश आहे.

    नोंद: ‘मुंबईचे वर्णन’ हे कै. माडगावकराचे पुस्तक मुंबई शहरातील मराठीतील पहिले पुस्तक होय.

    मुंबईचा वृत्तांत या १८८९ साली प्रसिध्द झालेल्या पुस्तकाचे विस्तृत प्रस्तावनेसह यथामूल पुनमुुद्रण

    Digital Book

    Original price was: ₹352.00.Current price is: ₹0.00.
  • -100%

    मुलखावेगळा राजा (औंधाचा राजा)

    0

    लेखकाचे काहीतरी

    मुलखावेगळा राजा ही गोष्ट आहे औंधाचे भवानराव पंतप्रतिनिधीं यांची. इतिहास नाही, पण सत्य गोष्ट आहे. भावनेत, स्मृतींत, जशी नोंद झाली आहे तज्ञीच सांगितली आहे.

    व्यक्ती सर्वच्या सर्व खऱया आहेत, काल्पनिक नाहीत, त्यांच्यासंबधीचा काही मजकूर त्यांना आवडणार नाही, कदाचित बोचेलसुद्धा. त्याबद्दल अगदी सपशेल, बिनशर्त दिलगिरी. कोणाला दुखविण्याचा, डिवचण्याचा हेतू नाही.

    सर्व संवाद भावना-स्मृतीत आहेत तसे, थोड्याफार फेरफाराने घातले आहेत. हे संवाद ध्वनिफितीवर नोंदले वा कागदावर टिपले नव्हते. पण त्यामागील भावना, हेतू सत्य आहे.

    साल, महिना, तारीख कदाचित काही ठिकाणी चुकली असणार. त्याबद्दल क्षमायाचना.

    श्री. रवींद्र कुलकर्णी यदुनाथ थत्तेंना घेऊन आले नसते तर ही गोष्ट कागदांवर आली नसती.

    गोष्ट लिहिताना जो आनंद वाटला त्याबद्दल त्या दोघांना धन्यवाद.

    आप्पा पंत – (पंत निवास : बंगलोर-लोणावळा)

    “पंत निवास”, भांडारकर रोड, पुणे ४११००४

    औंधाचा-राजा-भवानराव

    Digital Book

    Original price was: ₹35.00.Current price is: ₹0.00.
  • -100% रायगडची जीवनगाथा

    रायगडची जीवनकथा

    0

    पुस्तकाविषयी 

    “रायगडची जीवनकथा” या पुस्तकात रायगडवर घडलेला सर्वविध इतिहास साद्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे. रायगडच्या इतिहासासंबंधाने आजवर जे संशोधन झाले, ते सर्व या पुस्तकात अंतर्भूत झाले आहे; तेवढ्यापुरते हे पुस्तक संकलनात्मक मानता येईल. पण रायगडच्या परिसरात हिंडून अनेक असंशोधित, अव्वल दर्जाचे कागद पाहून, नकळून घेऊन त्यांचा येथे प्रथमच उपयोग केला आहे. पेशवेदप्तरातून रायगडसंबंधीची बरीच माहिती येथे प्रथमच ग्रंथित केली आहे. श्रीभारत इतिहास संशोधन मंडळातील स. ग. जोशी-दप्तर, चंद्रचूड-दप्तर यांतील अप्रसिद्ध माहितीचा अंतर्भाव येथे केला आहे. अश्ञा तऱहेने प्रथमच पुढे येणारा मजकूर भरपूर असून त्याने या पुस्तकाची किमान दहा प्रकरणे सजविली आहेत; तेवढ्यापुरते हे पुस्तक संशोधनात्मक आहे. रायगडचा बराच अप्रसिद्ध इतिहास देऊन हे पुस्तक अद्ययावत्‌ केले आहे. पूर्वीच्या संशोधनातून निर्माण झालेले अपसमज दूर केले आहेत व अनेक संशोधित ऐतिहासिक पत्रांची मितिशुद्धि केली आहे. यायोगे, प्रस्तुत विषयातील वाचकांच्या ज्ञानात भरपूर भर पडेल, असा विश्वास वाटतो.

    रायगडचा इतिहास संशोधनपूर्वक लिहिणे हे राष्ट्रीय कर्तव्य-कर्म होते व ते ऋण फेडण्याचा लेखकाचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    • पहिली आवृत्ती १९६२
    • दुसरी आवृत्ती १९७४
    • तिसरी आवृत्ती १९९५
    • चौथी आवृत्ती २००५
    • पाचवी आवृत्ती २००८

    Digital Book

    Original price was: ₹61.00.Current price is: ₹0.00.
  • -100% पठ्ठे बापुराव

    लोकशाहीर पठ्ठे बापूराव

    0

    ज्या काळात रंजन आणि प्रबोधन लोककलाच करत, त्या काळी लोकसंस्कृती आणि लोकजीवनाला उत्साहवर्धित प्रेरणा देण्याचे आत्यंतिक महत्त्वाचे कार्य तमाशा या मराठामोळ्या लोककलेने केले आहे. खेड्यापाड्यांतील वर्षभराच्या शिणलेल्या, मरगळलेल्या लोकजीवनाला एक नवे चैतन्य लाभे. या लोककलाकारांनी, लोकशाहिरांनी सामाजिक स्तरावर सांस्कृतिक जडणघडण केली आहे. पेशवेकालीन शाहिरांच्यानंतर तमाशा कला मंदावली होती; पण पठ्ठे बापूरावांसारखा शीघ्रकवी या कलेची ब्रत म्हणून सेवा करायला लागल्यानंतर त्यांच्या तमाशांनी अवघ्या महाराष्ट्राला वेडे केले. त्यांनी तमाशा कला कळसाला नेऊन पोचवली. त्या कलेला नवा प्राण दिला. तमाशा कला ही त्यांच्या जीवनाचा श्वास बनली होती. त्यांनी लोकरंजनाबरोबर लोकप्रोबधन करण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले. संसार मोडला. उच्चवर्णीय असूनही समाजाची पर्वा बाळगली नाही. गावाने बहिष्कृत केले तरी पठ्ठे बापूरावांनी हाती घेतलेला लोकजागराचा डफ खाली ठेवला नाही. त्यांच्या लेखणीने आणि वाणीने तमाशा कलेला बहर आला. एकदा म्हटलेली लावणी उद्या म्हणायची नाही, लावणी लिहिण्यासाठी एकदा कागदावर लेखणी ठेवली, की लावणी संपल्याशिवाय उचलायची नाही, शिळ्या पैशाचे तोंड पाहायचे नाही अशा या लोकविलक्षण शाहिराच्या लोकविलक्षण प्रतिज्ञा होत्या. संपूर्ण आयुष्यच त्यांनी तमाशा कलेला वाहिले होते. त्यांनी दोन लाखांहून जास्त लावण्या लिहिल्या ही घटनाही जगावेगळी होती.  आजही पठ्ठे बापूरावांच्या गण, गौळणी आणि लावण्यांशिवाय तमाशाची भैरवी होत नाही. 

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.