पुस्तकवाले

भवानराव पंतप्रतिनिधी

औंधाचे भवानराव पंतप्रतिनिधीं

ही गोष्ट आहे एका राजाची. राजेपण कधीच न मिरवलेल्या सच्च्या गांधीवादी माणसाची. राजा असला तरी तो प्रजेमध्ये मिसळून गेलेला असा माणूस महाराष्ट्रात होऊन गेला हे आता कदाचित पटणार नाही.

औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधींनी संस्थानात लोकशाही कशी आणली, हे ही जाणुन घेऊ! 

ओंकार करंबेळकर, बीबीसी मराठी प्रतिनिधी

15 सप्टेंबर 2020 / 26 नोव्हेंबर 2021

एल.एम.कडू यांची मुलाखत – बाल साहित्य अकादमी पुरस्कार मराठी (२०१७)

श्यामलाचे जग हा ब्लॉग आहे जो बाल लेखक, मुक्त हस्त लेखिका आणि  Kahani Takbak मुख्य विचारवंताने लिहिलेला आहे. या ब्लॉगमध्ये भारतीय बालसाहित्य जगतातील घडामोडी आणि व्यक्ती विषयावर आहे.

एल.एम.कडू यांची मुलाखत – बाल साहित्य अकादमी पुरस्कार मराठी (२०१७) – 18 जुलै 2017

मराठी साहित्यासाठी (2017) बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित, लक्ष्मण महिपती कडू (एल.एम. कडू) हे शेतकरी, चित्रकार आणि लेखक आहेत. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले खारीचा वाटा या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना  राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बालसाहित्याची चर्चा आणि चिंतन

बालसाहित्याविषयीचा विचार हा ग्रंथव्यवहारालाही चालना देत असतो. ‘येत्या वर्षभरात आजूबाजूच्या मुलांना मी दहा पुस्तकांची ओळख करून देईन आणि त्यांच्याकडून ती वाचून घेईन’ हा निश्चय प्रत्येकानं केला तर आगामी काळात मुलांच्या संदर्भातलं ग्रंथव्यवहाराचं चित्र पुष्कळच बदललेलं असेल.
– विद्या सुर्वे-बोरसे

बालसाहित्य प्रगल्भ व्हावे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुढाकाराने विदर्भ साहित्य संघ बालसाहित्यावर एक दिवसाचे राज्यस्तरीय चर्चासत्र आज बुलढाणा येथे आयोजित करीत आहे. त्या निमित्ताने मुलांच्या वाचनसंस्कृतीचा लेखाजोखा…

– नरेंद्र लांजेवार

बालसाहित्य कशासाठी?

‘जादूची चटई’ ते ‘जादूई दिवा’कालीन मराठी बालसाहित्य छापले जाणे जागतिकीकरणाच्या आरंभीच बंद झाले. भा. रा. भागवतांपासून ते बालसाहित्यात आवडीने वाचले जाणारे सारेच लेखक नव्या युगाच्या उंबरठय़ावर रद्दबातल ठरले, ते पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याची असोशी कायम राखल्यामुळे. पण शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम स्वीकारले म्हणून मातृभाषेकडे पूर्ण पाठ फिरवण्याची गरज नाही, हे स्पष्ट करणारे नवे लेखक आणि चित्रकार सध्या देशभरात प्रादेशिक बालसाहित्याची निर्मिती करीत आहेत. इंग्रजी उत्तम राखून आपल्या पाल्याला मातृभाषेचीही गोडी लागण्यासाठी या बालग्रंथ प्रयोगांचे आजच्या काळातील महत्त्व पालकांनी जाणून घेण्याची मात्र गरज आहे. शाळांना लागणाऱ्या उन्हाळी सुट्टय़ांच्या निमित्ताने ताज्या मराठी बालसाहित्याची हालहवाल घेण्याचा हा प्रपंच.

– माधुरी पुरंदरे

गोष्टीवेल्हाळ! – द. मा. मिरासदार

कथा हा साहित्यप्रकार अतिशय तरलपणे हाताळणाऱ्या त्या काळातील नवकथेहून निराळा बाज घेऊन दमा साहित्यविश्वात अवतरले. त्यांच्या चित्रमय शैलीने वाचणारा नुसता गालातल्या गालात स्मित करीत नाही, तर खळखळून हसतो. जणू काही ती घटना आपल्या समोरच घडते आहे, असा सुखद भास व्हावा, अशी त्यांची कथा. वाचनाएवढेच त्यांच्या कथा त्यांच्या मुखातून ऐकणे अधिक बहर आणणारे. उत्तम वक्ता असणे वेगळे आणि कथा रंगवून सांगणे वेगळे. मिरासदारांकडे हे दोन्ही गुण होते. त्यांची कथा ऐकणे म्हणजे शब्दांतून रंगणारा चित्रपट. त्यातील पात्रे, त्यांचे संवाद, घटना, त्यातील फजिती, त्याने येणारे कसनुसेपण हे सारे त्यांच्या कथाकथनात अशा बाजाने येत असे, की श्रोता हसून हसून दमून जाई. मिरासदार, पाटील आणि माडगूळकर या लेखकत्रयीने महाराष्ट्राला त्याची खरीखुरी ओळख करून दिली. शहरी लेखकांच्या कथा वाचणाऱ्या वाचकांनाही मिरासदारांनी अतिशय अलगदपणे आपल्या तंबूत आणून ठेवले. केवळ विनोद एवढय़ाच भांडवलावर ते शक्य नव्हतेच. माणसे वाचत असताना, त्यांच्या भोवतालचा परिसर, त्यांच्या लकबी, त्यांच्यातील पापभीरूपणा, टागरटपणा, इरसालपणा, बेरकीपणा, वाह्य़ातपणा, सौजन्य आणि औद्धत्य या सगळ्या गुणांचा दमा आपल्या कथांमधून सहजपणे परिचय करून देतात. त्यामुळे त्या कथांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

RSS
Follow by Email
Shopping cart close