• -100%

    मुलखावेगळा राजा (औंधाचा राजा)

    0

    लेखकाचे काहीतरी

    मुलखावेगळा राजा ही गोष्ट आहे औंधाचे भवानराव पंतप्रतिनिधीं यांची. इतिहास नाही, पण सत्य गोष्ट आहे. भावनेत, स्मृतींत, जशी नोंद झाली आहे तज्ञीच सांगितली आहे.

    व्यक्ती सर्वच्या सर्व खऱया आहेत, काल्पनिक नाहीत, त्यांच्यासंबधीचा काही मजकूर त्यांना आवडणार नाही, कदाचित बोचेलसुद्धा. त्याबद्दल अगदी सपशेल, बिनशर्त दिलगिरी. कोणाला दुखविण्याचा, डिवचण्याचा हेतू नाही.

    सर्व संवाद भावना-स्मृतीत आहेत तसे, थोड्याफार फेरफाराने घातले आहेत. हे संवाद ध्वनिफितीवर नोंदले वा कागदावर टिपले नव्हते. पण त्यामागील भावना, हेतू सत्य आहे.

    साल, महिना, तारीख कदाचित काही ठिकाणी चुकली असणार. त्याबद्दल क्षमायाचना.

    श्री. रवींद्र कुलकर्णी यदुनाथ थत्तेंना घेऊन आले नसते तर ही गोष्ट कागदांवर आली नसती.

    गोष्ट लिहिताना जो आनंद वाटला त्याबद्दल त्या दोघांना धन्यवाद.

    आप्पा पंत – (पंत निवास : बंगलोर-लोणावळा)

    “पंत निवास”, भांडारकर रोड, पुणे ४११००४

    औंधाचा-राजा-भवानराव

    Digital Book

    Original price was: ₹35.00.Current price is: ₹0.00.
  • -100%

    कर्मवीर भाऊराव पाटील (काल आणि कर्तृत्व)

    1

    भाऊरावांच्या या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अंतिम हेतू पिळवणूकरहित एकसंध भारतीय समाजनिर्मितीचा होता. जातपात, भेद यांना थारा न मिळता सर्वांना मानव म्हणून शिक्षणाची व प्रगतीची संधी मिळाली पाहिजे. भारतास आत्मनिर्भर, संपन्न राष्ट्र बनविण्याचा तोच मार्ग आहे अज्ञी त्यांची ठाम समजूत होती. परंतु हे ध्येय साध्य करण्यासाठी भाऊरावांनी आपल्या वसतिगृहातील कमकुवत स्तरातील मुलांना, जात-पात, जातिबहिष्कृतता, स्पृद्याकडून होणारी पिळवणूक व जुलूम यापासून निर्भय बनण्यास प्रथम शिकविले. भित्रा मनुष्य बंडखोर बनू शकत नाही. सांप्रदायिकता, जातपात, विवेकशून्य रूढी यांच्या भयापासून मुलांना मुक्त करून त्यांना मुक्त मानव बनविण्याचे भाऊरावांचे तत्त्वज्ञान होते; आणि हे काम परकीय सत्तेच्या भयापासून मुक्त करण्यास पूरक होते.

    महाराष्ट्राच्या बाबतीत ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निरर्थक असल्याचे १९५३ साली त्यांनी पहिल्या महाराष्ट्र सामाजिक परिषदेत जाहीरपणे सांगितले होते. याची जाण भाऊरावांनी सन १९२२-२३ साली ‘कुऱ्हाड’ साप्ताहिकासाठी प्रबोधनाच्या पहिल्या प्रस्तावनेत स्पष्ट केली होती. सन १९५८ साली सातारच्या जिल्हा परिषदेने भाऊरावांना त्याच्या आजारपणाच्या स्थितीत मानपत्र देऊन सत्कार केला, त्यावेळी भाऊराव म्हणाले, ब्राह्मण समाजावर तरुणपणाच्या अविचारी अवस्थेत त्या काळास अनुसरून त्यांनी टीका केली; त्याबद्दल त्यांना पश्चाताप होतो आहे. आता हा वाद गाडून टाकला पाहिजे.” आंतरजातीय विवाह हा वाद मोडण्यास पूरक आहे अशी त्यांची धारणा असल्याने अश्या लग्नसमारंभास भाऊराव स्वतः हजर राहून वधूवरांना आक्रीर्वाद देत. आचार्य अत्र्यांच्या विवाहास ते हजर होते. कारण अत्र्यांचा तो विवाह आंतरजातीय होता.

    Digital Book 

    Original price was: ₹23.00.Current price is: ₹0.00.
  • -100% हुतात्मा दामोदर हरि चाफेकर

    हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त

    0

    रॅन्डचा खून केल्यामुळे दामोदर हरि चापेकरांना फाशीची शिक्षा झाली असता ऑक्टोबर, १८९७ मध्ये येरवडा कारागृहात त्यांनी आपली सर्व हकिकत मोडीत लिहून ठेविली. श्री. वि. गो. खोबरेकर यांनी सदर मोडी हस्तलिखिताचे बालबोधीकरण व संपादन करून ते प्रकाशनासाठी मंडळाच्या स्वाधीन केले,  त्याकरीता मंडळ आभारी आहे. येरवडा कारागृहात असलेले हे मोडी बाड पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्याने मराठी वाचकास एका क्रांतिकारकाच्या मनाची तळमळ, त्यांनी आपल्या साध्याकरिता केलेली साधना याचा परिचय होईल आणि क्रातिकारकांवरील वाड़्मयात मोलाची भर पडली. 

    लक्ष्मणशास्त्री जोशी 

    २९ नोव्हेंबर, १९७४. अध्यक्ष.

    महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, मुंबई ३२.

    कार्तिक शुक्ल १५, १८९६

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% बालगंधर्व

    एक होता गंधर्व

    0

    एक होता गंधर्व

    – निवेदन – 

    “एक होता गँधर्व”ही आहे बालगंधर्वाची जीवनकथा. 

    नागपूरचे डॉ. राम म्हैसाळकर यांनी लिहिलेली .

    जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेली.

    मधमाशांच्या मधानं लदलदलेल्या पोळाप्रमाणं.

    बालगंधर्वाच्या आयुष्यातले चढउतार शब्दबद्ध करणारी.

    बालगंधर्वाचा आयुष्यपट उलगडून दाखविता दाखविता तत्कालीन कालपट उलगडून दाखविणारी.

    या कालपटातला संगीताच्या क्षेत्रातला वैभवकाळ चित्रीत करणारी.

    मराठी नाट्याच्या व संगीताच्या रसिकांना अनमोल खजिना उपलब्ध करून देणारी.

    भीज पाऊस मनोहर आहे असं नुसतं म्हणायचं नसतं.

    या भीजपावसात मनसोक्त भिजायचं असतं.

    चला, येताय ना भिजायला.

    रा. रं. बोराडे,  अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य साहित्य आणिसंस्कृती मंडळ 

    दिनांक : २०-९-२००१

    Digital Book

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% Dhondo keshav karve

    महर्षी धोंडो केशव कर्वे

    0

    अण्णासाहेबांना खंत होती, ती ही की स्वातंत्र्यानंतर समता आलेली नाही. समता आल्याशिवाय स्वातंत्र्याची खरी गोडी चाखता येणार नाही, असे ते म्हणत. महर्षी कर्वे यांनी कधीही तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला नाही किंवा लोकांना कोणता उपदेश केला नाही. कर्वे यांचे कार्य हाच कर्वे यांचा संदेश होता. ‘आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण झाडापर्यंत तरी जाईल’ या वचनाप्रमाणे कर्वे कार्य करीत राहिले.

    कर्वे यांच्या थोरवीबद्दळ आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ‘मी कोण आहे’ असा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला आणि त्याचे वस्तुनिष्ठ उत्तर स्वतःच शोधून काढले. म्हणूनच ते म्हणतात-“मी समाजकार्याला सर्वस्वी वाहून घेतले नाही. संसारी माणूस व संन्यासी वा त्यागी माणूस या दोघांच्या मधला मार्ग मी स्वीकारला. मी संसार नेटका केला नाही. कसाबसा करीत राहिलो. अजूनही करीत आहे. कुटुंबासाठी घरदार किंवा द्रव्यसंचय मी केला नाही. जरुरीपुरतेच वैयक्तिक व कौटुंबिक स्वार्थाकडे लक्ष देऊन बाकीचे सामर्थ्य व उर्वरित द्रव्य लोकहिताच्या कामी खर्चणे हा माझा स्वभाव बनला आहे.”स्वतः विषयीची वस्तुनिष्ठ जाणीव व स्वतःचे यथार्थ मूल्यमापन थोड्याच लोकांना करता आले. महर्षी कर्वे यांनी असे मूल्यमापन स्वतः केले.

    धर्म, नीतिशास्र आणि तत्त्वज्ञान यासंबंधी त्यांचे विचार पुरोगामी होते. त्यांचे सर्व आचरण धर्माधारित होते. हा धर्म कोणता? सद्‌विचारधर्म. अण्णासाहेबांनी धर्मविचारात आणि कर्माचरणात कर्मकांडाळा कधीच स्थान दिले नाही. त्यांचा मानसिक पिंड एखाद्या संन्याशासारखा अविचल आणि निर्विकार होता. 

    Original price was: ₹35.00.Current price is: ₹0.00.
  • -100% तंट्या-भिल्ल

    जननायक तंट्या भिल्ल

    0

    एकशे  पंचवीस वर्षापूर्वी आपल्याकडे इंग्रजांचा अंमल होता. आजच्या जळगाव-धुळे जिल्ह्यांस त्या काळात खानदेश म्हणत. खानदेझ्ञाला लागून वरच्या बाजूने सातपुडा डोंगराची रांग आहे. याला लागून होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिद्यांचा पूर्व निमाड हे भाग होते. खानदेश, होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिद्यांचा पूर्व निमाडची हद्द जळगाव जिल्ह्यातील पालजवळ मिळत होती. त्या भागात तंट्या भिल्लाचे गाव होते. माउंटअबूपासून सुरू होणारा विध्य, सातपुडा आणि बस्तरपर्यंतच्या डोंगराळ भागात आदिवासींची मोठी वस्ती आहे. यातच भिल्लांची मोठी संख्या आहे.

    मराठेझाहीचा १८१८ साली अस्त झाला. परंतु त्या काळात सातपुडातील बहादुर भिल्लांनी अनेक वर्षे गनिमी काव्यानं इंग्रजांशी झुंज दिली. सातपुडा, सातमाळा, अजिंठ्याच्या डोंगरांतील अनेक भिल्ल नायकांनी इंग्रजांशी प्रखर लढा दिला. ह्यात सातमाळातील भागोजी नाईक, सातपुडातील कजरसिंग नाईक, भिमा नाईक आणि तंट्या भिल्लाचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काही सोनेरी पाने आहेत.

    भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाप्रमाणेच या आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहासही महत्त्वाचा  आहे. बलाढ्य ब्रिटिझञ सत्तेला अकरा वर्ष सळो की पळो करणारा तंट्या भिल्ल हा

    ज्या काळात होळकर, निजाम, झिंदे अन्‌ इतर संस्थानिक ब्रिटिझ सत्तेची हुजरेगिरी करण्यात मशगुल होते, त्या काळात हा लोकविलक्षण नायक जनाधारावर झुंजत होता. अकरा वर्ष ब्रिटिश सत्तेच्या तोंडचे पाणी तंट्याने पळविले. त्याची एकाकी झुंज आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातील एक सोनेरी पान आहे. 

    Digital Book

    Original price was: ₹45.00.Current price is: ₹0.00.
  • -100% अहिल्याबाई

    तेजस्विनी अहिल्याबाई होळकर

    0

    ही तर रणरागिणी प्रजा वत्सल राणी 

    ज्या समाज रचनेत कोणतीही उन्नतीची साधने स्रियांना उपलब्ध नसताना, त्याकाळी या महान कर्तृत्व शालिनीने “पति’ बरोबर “सति” न जाता प्रजापालन करण्यासाठी जीवन जगण्याचा स्वीकार केला!!  ही प्रजा वत्सल राणी जनमानसाच्या डोळ्यातील पाणी पुसणारी खरी लोकमंगल माता झाली!!  संपूर्ण भारतात त्यांचे नांव अत्यंत श्रद्धेने गौरवले गेले आहे. अत्यंत समृद्ध अशा राज्याची स्वामीनी असूनही आपली सर्व संपत्ती लोककल्याणार्थ खर्च केली. मंदिरे आणि तीर्थस्थाने यांना संरक्षण दिले. भारतीय शिल्प, कला, साहित्य आणि संस्कृती यांची अमोल सेवा केली. भारताच्या राज्य प्रशासनात त्यांच्या कार्याचे स्थान अढळ आहे. सर्व स्वकीयांना इंग्रज फिरंग्या विरुद्ध एकत्र होण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांनी पुढील संकट ओळखले होते – अशी दूरदृष्टी – अशी प्रजा वत्सल समदहृष्टी आणि कर्तृत्व सृष्टी – असलेल्या अहिल्या देवीचे या महान लोकमातेचे चरित्राचे  वाचक वर्ग उत्साहाने स्वागत करतील अज्ञी आशा  आहे. 

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग

    महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग

    0

    महाराष्ट्रमहोदयाचा पूर्वरंग  

    श्रीमज्ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला मराठी भाषेचा पोशाख चढवून स्वतःबरोबरच भाविक प्राकृत जनांस अमृतानुभवाची वाट दाखवून समाधि घेतल्यावर लवकरच महाराष्ट्रसाम्राज्य लयास गेलें. परंतु बाह्यतः जरी हा मोठा फरक झाली तरी ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रीयांच्या विचारस्वातंत्र्यास जें शुद्ध, सात्त्विक आणि ठळक वळण लावून दिलें तें कायमच झालें. ज्ञानेश्वरांचा समकालीन परंतु त्यांच्या मागें अर्धशतकावर जगलेला असा जो नामदेव, त्याला परधर्मी राजाचा काच सोसावा लागलाच. तात्पर्य काय, नामदेवापासून तों तहत तुकाराम-रामदासांपर्यंत अडीच-तीनशें वर्षांत पुढें होणाऱ्या यच्चयावत्‌ साधुसंतांस व त्यांच्या अनुयायांस आणि त्यांच्या समकालीन सर्व स्वधर्मनिष्ठ मराठ्यांस परधर्मी राजांचा आणि राजपुरुषांचा छळ सोसावा लागला. त्या सर्वांनी तो आपापल्यापरी ईश्वरावर श्रद्धा ठेवून सोसलाही; परंतु आपणांस हा सोसावा लागत असणारा जाच अन्नाय्य आहे; हे परकी लोक आपल्या देशांत केवळ शिरजोरपणाने घुसले आहेत; त्यांचा धर्म त्यांना जितका प्रिय आहे तितकाच आपला धर्म आपणांलाही प्रिय असला पाहिजे; ते जसे, ‘ईश्वराचे आपण लाडके भक्त असें मानितात; तसेच आपण मराठे लोकही ईश्वराचीं लाडकीं लेंकरेंच आहोंत; असें समजण्यास काय हरकत आहे? 

    ईश्वर न्यायी आहे; तो सर्वांवर सारखी दया करणारा आहे. त्याच्यापुढें हा मराठा, हा मुसलमान; पहिला नावडता, दुसरा आवडता असला भेद नाहीं. मात्र जो जसें कर्तव्य बजावील, जो जसा आपल्या धर्मास, आपल्या जन्मभूमीस, आपल्या देशबांधवांस ऐक्यानें भजेल, तसा तो, त्याची जन्मभू, त्याचे देशबांधव परस्परांस सुखप्रद होतील, व त्या सर्वांची एकतानता होऊन सर्वांचा सारखाच उद्धार होईल. त्यांच्यांतील परस्परमत्सरामुळें त्या सर्वांची झालेली, होत असलेली व पुढें होणारीही दैना दूर होईल आणि जगांतील इतर लोकांस व सदुदाहरण घालून देऊन वैभवाच्या शिखरावर सुखनिद्रा घेऊं शकतील. अजा प्रकारच्या सात्त्विक श्रद्धेनें, दैवी संपत्तीच्या लालसेनें, स्वदेश, स्वधर्म आणि सदाचार यांची उन्नति करणें, हेंच कर्तव्य समजून, सतत कायावाचामनें प्रयत्न करणारे महाराष्ट्रांतील आचांडाळब्राह्मण जातींतील सर्व सत्पुरुष कसे वागले आणि त्यांना व त्यांच्या स्वदेश, स्वधर्म आणि स्वजन या प्राणप्रिय त्रयीला परम श्रेयस्कर अशी उन्नति कशी प्राप्त झाली, हें दाखविण्याचा ह्या लेखाचा उद्देश आहे. म्हणजे श्रीमुकुंदज्ञानेश्वरांच्या परमामृत, अमृतानुभवानंतर दैवानें उलट खाल्यामुळे ‘न हिन्दुर्न यवनः’ असला प्रकार झाल्यावर श्रीसमर्थ रामदासांच्या दासबोधाची आवश्यकता कशी आली आणि तो बोध सार्थनाम कसा झाला हें दाखवावयाचें आहे.  

    वरील उद्देश तडीस नेण्यास अवइ्य असणारी विद्ठत्ता लेखकाला नाहीं; तथापि ‘प्रयत्नीं परमेश्वर’ ह्या वृद्धवचनावर भरंवसा ठेवून तो चालणार आहे. श्रीज्ञानेश्वरमुकुंदराजप्रभृति साधुसंतांच्या लेखांचा, तसाच बखरी, कागदपत्रें आणि राजवाडेप्रभृती स्वेतिहासशोधकांनीं उघडकीस आणलेल्या विविध माहितीचा शक्‍य तितका उपयोग करून हा लेख सजविण्याचा विचार आहे.  

    ह्यांत तेरावें चौदावें आणि पंधरावें ह्या तीन संबंध झ्तकांचा महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय असा तिन्ही बाजूंचा संक्षिप्त इतिहास येणार आहे. तरी वाचकांनीं सावधान राहून ग्राह्य घ्यावें, त्याज्य टाकावें आणि अक्षम्य चुका असतील त्या पदरांत घालून त्या सुधारण्याचा मार्ग त्याला दाखवावा आणि परस्परांची समजूत पटवून ऐक्य साधण्याचा संकल्प करावा, एवढी विनंति करून स्वीकृत कार्यास आरंभ करितों. 

    Digital Book 

    Original price was: ₹5.00.Current price is: ₹0.00.
  • -100%

    क्रांतिसुक्ते: राजेर्षी छत्रपती शाहू

    0

    क्रांतिसूक्ते: राजर्षी शाहू छत्रपतींच्या भाषणांचा टिपा-टिप्पणीसह चिकित्सक अभ्यास

    राजर्षींच्या या ‘क्रांतिसूक्ता’ स आजच्या स्वातंत्र्योत्तर काळातील संदर्भ काय, याचाही विचार केला पाहिजे. महाराजांनी ज्यासाठी निर्धाराने झुंज दिली त्या गोष्टी आज पूर्णांशाने साकार झालेल्या नसल्या तरी त्या दिशेने फार मोठी प्रगती झाले आहे हे नाकारता येणार नाही. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामधील अनेक कर्तृत्वसंपन्न व्यक्ती राजकारणापासून शिक्षणापर्यंतच्या सर्व क्षेत्रांत आपल्या कृतीधृतीने चमकत आहेत. तथापि आपला समाज एकरस आणि एकजीव व्हावा हे राजर्षींचे स्वप्न तेवढ्या प्रमाणात साकार व्हायचे आहे. वाट मोठी आहे; हिमतीने चाल जरूर आहे. राजर्षी आहू छत्रपतीना अभिप्रेत असळेली सर्वकष क्रांती पूर्णत्वाने अजून व्हायची आहे. ‘श्रीशाय जनतात्मने’ ची प्रकर्षाने वानवा आहे. याचे तात्पर्य काय ते एवढेच आहे.

    प्रस्तुत संग्रहात डॉ. भोसले यांनी राजर्षींची मराठी भाषणे तेवढी संगृहीत केली आहेत. राजर्षींच्या इंग्रजी भाषणांचा वेगळा संग्रह  A Royal Philosopher Speaks  या सुरेख मथळ्याने सिद्ध झाला आहे. प्रा. भोसले यांनी ‘क्रान्तिसूक्ते’ मध्ये राजर्षींची मराठी भाषणे विषयवार विभागणी करून ती छापली आहेत. डॉ. भोसले यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेले “टिपा आणि टिप्पणी’ हे सदर आजच्या अभ्यासकांना फार उपयुक्त होईल. त्यावरून डॉ. भोसले यांच्या संपादनकुडालतेची उत्तम साक्ष पटते. या कार्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. राजर्षींच्या भाषणांचा असा हा सुंदर संग्रह सर्वांच्या आदरास पात्र होईल यात शंका नाही.

    नागपूर वि. भि कोलते

    Digital Book

    Original price was: ₹175.00.Current price is: ₹0.00.
  • -100% समर्थ

    समर्थ रामदासांची साहित्य सृष्टी

    0

    समर्थ चरित्राची रूपरेषा

    आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला संत परंपरेचे फार मोठे वरदान लाभले आहे. विशेष म्हणजे मराठी संतांनी केवळ चमत्कार केले नाहीत तर त्यांनी चिरंतन असे आध्यात्मिक विचारधन पाठीमागे ठेवले.  हजारो वर्षे मराठी माणूस या विचारांच्या प्रकाशात जीवनाची यशस्वी वाटचाल करीत राहील. आद्यतम कवी मुकुंदराजांचा विवेकसिंधू, संत शिरोमणी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत नामदेव आणि संत तुकाराम यांचे हजारो अभंग, समर्थ रामदासांचा दासबोध, संत एकनाथ महाराजांचे भागवत हे सारे ग्रंथ म्हणजे महाराष्ट्राची खरी संपदा आहे. संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई आदी संतांनी देखील या विचारधनात मौलिक भर घातली. महाराष्ट्रातील संतांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ भाबडेपणा किंवा अंधश्रद्धा यांना कधीही खत-पाणी घातले नाही. त्यांनी मराठी माणसाचे ज्ञानचक्षू उघडले. त्याची विचारशक्ती जागी केली. या सर्व संतांनी शास्त्रशुद्ध परिभाषेत आध्यात्मिक विचार दिले. प्रस्तुत ग्रंथात आपण समर्थ रामदासांच्या समग्र साहित्याचा परामर्श घेणार आहोत. 

    अनुक्रमणिका

    • निवेदन……
    • समर्थ चरित्राची रूपरेषा…
    • करूणाष्टके : समर्थांचे आत्मचरित्र ….
    • मनाचे श्लोक…..
    • आत्माराम…..
    • तुळजाभवानीची स्तोत्रे
    • हनुमंताची स्तोत्रे…
    • गुरुगीता
    • समर्थांचा पत्रव्यवहार
    • राजधर्म, क्षात्रधर्म अखंड सावधानता…
    • मुसलमानी अष्टक
    • ग्रंथराज दासबोध..
    • समर्थांच्या आरत्या …..
    • भौगोलिक स्थानांची वर्णन ……
    • एकवीस समासी : जुना दासबोध ….
    • काही स्फुट प्रकरणे ….
    • समर्थांची लोकसाहित्य रचना….
    • धन्य ते गायनी कळा …..
    • समर्थांचे अभंग …
    • संदर्भ ग्रंथ…..

    Digital Book 

    Original price was: ₹60.00.Current price is: ₹0.00.
  • -100% छत्रपती

    छत्रपती शिवाजी महाराज

    1

    निवेदन

    लोकोत्तर व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो कधीही पुरेसा आणि समाधानकारक असत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अशा व्यक्तींपैकी एक होते.

    शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांनी घडविलेला इतिहास हा केवळ मराठी भाषा असलेल्या अभ्यासकांचा-सृजनशील लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला नाही तर इतर भारतीय भाषांतील अभ्यासकांच्या, लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला आहे.

    अशा या लोकोत्तर पुरुषाच्या जीवनाचा व त्यांनी घडविलेल्या इतिहासाचा मोजक्या पण नेमक्या  शब्दांत परिचय व्हावा म्हणून श्रीशिवाजी महाराजांवर एक छोटेखानी चरित्रग्रंथ लिहून देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने डॉ. प्र. न. देशपांडे यांना केली. “शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली; न्यायदानात निःस्पृहता दर्शविली; गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱयांना मुलाहिजा न ठेवता समज दिली; पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले; सर्व धर्माना समान लेखले; साधुसंतांचा यथोचित आदर केला; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱया महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरुष होता.” हा या चरित्रग्रंथाचा डॉ. प्र. न. देशपांडे यांनी केलेला समारोप वाचल्यानंतर त्यांनी आमची विनंती सन्मानित केल्याचे स्पष्ट होते. डॉ. प्र. न. देशपांडे यांचे आम्ही आभारी आहोत.

    – रा. रं. बोराडे

    मुंबई अध्यक्ष

    दि. १६ जुलै, २००२ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

    Digital Book

    Original price was: ₹45.00.Current price is: ₹0.00.
  • -100% महात्मा-गांधी-रविंद्रनाथ-ठाकुर

    महात्मा गांधी…रविंद्रनाथ ठाकुर

    0

    गुरूदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांच्या चिंतनामधून महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलू आणि वैशिष्ट्यांबद्दल आपणांस माहिती मिळते. हा एक वेगळा आणि मनस्वी अनुभव आहे. रवीन्द्रनाथांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांकडून महात्मा गांधींसारख्या श्रेष्ठ व्यक्तीबद्दल व्यक्‍त झालेले चिंतन हा भारतीय साहित्यसृष्टीचा अमोल ठेवा आहे.  मंडळाचा सुवर्णमहोत्सवाच्या प्रसंगी तो पुन्हा एकदा मराठी वाचकांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे. 

    रवीन्द्रनाथांसारख्या रसिक कविवर्याने महात्मा गांधींवर बंगालीत जे लिहीले आहे,  ते मराठीत प्रथमच प्रकाशित करण्याचा हा सुयोग. प्रा. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे संस्कृत, पाली, तिबेटी व बंगाली या भाषेवरील प्रभुत्व सर्वश्रुत आहे. त्यांनी करुन दिलेल्या ह्या भाषांतराचे ऋण न फिटणारे आहे.

    मधु मंगेश कर्णिक,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.