Description
अध्यक्षांचे निवेदन
श्री. शंकरभाई पटेल यांनी लिहिलेले “हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम” हे पुस्तक ऑक्टोबर १९८६ मध्ये मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आले होते. या पुस्तकात असंख्य मुद्रणदोष असल्याचे आणि त्याच्या मुखपृष्ठाची छपाई गचाळ असल्याचे आढळले. रणजित प्रकाशन, कोल्हापूर या संस्थेने या पुस्तकाचे मुद्रण मंडळाचे तेव्हाचे सदस्य डॉ. एस. एस. भोसले यांच्या निरीक्षणाखाली करावे असे ठरले होते. प्रकाशित पुस्तकाचे मुद्रण अत्यंत असमाधानकारक झाले असल्याचे प्रकाहन समारंभ पार पडल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे मूळ पुस्तकाचे वितरण करण्याऐवजी लेखक श्री. शंकरभाई पटेल यांच्या संमतीने सुधारित मुद्रणप्रत मागवून ती छापण्याचा तेव्हाच्या मंडळाने निर्णय घेतला.
दुर्दैवाने मूळ पुस्तकाचे लेखक श्री. शंकरभाई पटेल यांचे निधन झाल्यामुळे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचे ज्येष्ठ सेनानी श्री. गोविदभाई श्रॉफ यांच्याबरोबर विचारविनिमय करून प्रा. भगवंतराव देझमुख यांनी सुधारित मुद्रणप्रत मंडळाच्या स्वाधीन केली. ती माहितीच्या दृष्टिने शक्य तितकी निर्दोष व्हावी यासाठी श्री. गोविंदभाई श्रॉफ आणि प्रा. भगवंतराव देशमुख यांनी अपार परिश्रम घेतले. तसेच या दोघांनी या पुस्तकाची मुद्रितेही काळजीपूर्वक तपासून दिली. त्यासाठी कोणतेही मानधन न घेता त्यांनी मंडळास मदत केली याबद्दल मंडळ त्यांचे सदैव कर्णी राहील.
श्री. शंकरभाई पटेल आज हा ग्रंथ प्रकाशित होत असताना हयात नाहीत याबद्दल हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणेच मंडळाच्या सदस्यांनाही अत्यंत दुःख होत आहे. शंकरभाईंच्या या आठवणी म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा समग्र विश्वसनीय इतिहास आहे असे समजण्याचे कारण नाही.या लढ्यातील ज्या घटनांशी शंकरभाईंचा प्रत्यक्ष संबंध आला त्यांच्याबद्दल तपज्ञीलवार साक्ष देण्यावर शंकरभाईंचा जास्त भर आहे. ते स्वतः या लढ्यात सहभागी झालेले असल्यामुळे विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिणे साहजिक होते. स्वातंत्र्यलढ्याविषयी कुतूहल असलेल्या सर्वसामान्य वाचकाला त्याचप्रमाणे इतिहासाच्या अभ्यासकांना एक महत्त्वाचे साधन म्हणून हा ग्रंथ उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
य. दि. फडके
अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
३० एप्रिल १९९३
अर्पण
हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामाचे शिल्पकार आणि या संग्रामातील ज्येष्ठ सेनानी, माझ्या राजकीय जीवनातील आदरणीय गुरू, निष्ठावान लोकनेते श्री. गोविंददासजी श्रॉफ यांना –
प्रिय गोविदभाई,
माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपण जवळ केले; राजकीय जीवनातील सहकारी म्हणून विश्वसनीयांत माझी गणना केली; हैदराबादच्या स्वातंत्र्य-संग्रामातील एक सैनिक होण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आणले; या सर्व आठवणींनी माझे मन कृतज्ञतेने उचंबळून येते.
हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामात औरंगाबाद जिल्ह्यात घडलेल्या अनेक रोमहर्षक प्रसंगांचा मी एक जिवंत साक्षीदार! आज मी जराजर्जर झालो आहे. सारे जीवन उजळून टाकणाऱ्या स्वातंत्र्य संग्रामातील या माझ्या आठवणी.
आपणांविषयीच्या कृतज्ञतेने ठिबकणारे हे माझे आनंदाश्रू, निरपेक्ष प्रेमाने व अतीव भक्तिभावाने मी आपल्याच चरणी अर्पण करीत आहे. स्वीकार व्हावा.
शंकरभाई पटेल, औरंगाबाद
२ ऑक्टोबर १९८६
अनुक्रमणिका
-
प्रस्तावना
-
अध्यक्षांचे निवेदन .
-
कै. श्री. शंकरभाई पटेल
-
निझामी राजवट
-
महाराष्ट्र परिषद
-
१९३८ चा सत्याग्रह
-
वैयक्तिक सत्याग्रह
-
१९४७ चा सत्याग्रह
-
कारागृहातून पलायन
-
रझाकार व सरंजामी राजवट
-
सशस्र लढा
-
निझामी हद्दीतील लढ्याची काही केन्द्रे
-
शस्त्रासाठी कारागृह
-
रझाकारांचे अत्याचार आणि पोलीस कारवाई
Reviews
There are no reviews yet.