• -100% छत्रपती

    छत्रपती शिवाजी महाराज

    1

    निवेदन

    लोकोत्तर व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो कधीही पुरेसा आणि समाधानकारक असत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अशा व्यक्तींपैकी एक होते.

    शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांनी घडविलेला इतिहास हा केवळ मराठी भाषा असलेल्या अभ्यासकांचा-सृजनशील लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला नाही तर इतर भारतीय भाषांतील अभ्यासकांच्या, लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला आहे.

    अशा या लोकोत्तर पुरुषाच्या जीवनाचा व त्यांनी घडविलेल्या इतिहासाचा मोजक्या पण नेमक्या  शब्दांत परिचय व्हावा म्हणून श्रीशिवाजी महाराजांवर एक छोटेखानी चरित्रग्रंथ लिहून देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने डॉ. प्र. न. देशपांडे यांना केली. “शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली; न्यायदानात निःस्पृहता दर्शविली; गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱयांना मुलाहिजा न ठेवता समज दिली; पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले; सर्व धर्माना समान लेखले; साधुसंतांचा यथोचित आदर केला; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱया महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरुष होता.” हा या चरित्रग्रंथाचा डॉ. प्र. न. देशपांडे यांनी केलेला समारोप वाचल्यानंतर त्यांनी आमची विनंती सन्मानित केल्याचे स्पष्ट होते. डॉ. प्र. न. देशपांडे यांचे आम्ही आभारी आहोत.

    – रा. रं. बोराडे

    मुंबई अध्यक्ष

    दि. १६ जुलै, २००२ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

    Digital Book

    Original price was: ₹45.00.Current price is: ₹0.00.
  • -100%

    कर्मवीर भाऊराव पाटील (काल आणि कर्तृत्व)

    1

    भाऊरावांच्या या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अंतिम हेतू पिळवणूकरहित एकसंध भारतीय समाजनिर्मितीचा होता. जातपात, भेद यांना थारा न मिळता सर्वांना मानव म्हणून शिक्षणाची व प्रगतीची संधी मिळाली पाहिजे. भारतास आत्मनिर्भर, संपन्न राष्ट्र बनविण्याचा तोच मार्ग आहे अज्ञी त्यांची ठाम समजूत होती. परंतु हे ध्येय साध्य करण्यासाठी भाऊरावांनी आपल्या वसतिगृहातील कमकुवत स्तरातील मुलांना, जात-पात, जातिबहिष्कृतता, स्पृद्याकडून होणारी पिळवणूक व जुलूम यापासून निर्भय बनण्यास प्रथम शिकविले. भित्रा मनुष्य बंडखोर बनू शकत नाही. सांप्रदायिकता, जातपात, विवेकशून्य रूढी यांच्या भयापासून मुलांना मुक्त करून त्यांना मुक्त मानव बनविण्याचे भाऊरावांचे तत्त्वज्ञान होते; आणि हे काम परकीय सत्तेच्या भयापासून मुक्त करण्यास पूरक होते.

    महाराष्ट्राच्या बाबतीत ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निरर्थक असल्याचे १९५३ साली त्यांनी पहिल्या महाराष्ट्र सामाजिक परिषदेत जाहीरपणे सांगितले होते. याची जाण भाऊरावांनी सन १९२२-२३ साली ‘कुऱ्हाड’ साप्ताहिकासाठी प्रबोधनाच्या पहिल्या प्रस्तावनेत स्पष्ट केली होती. सन १९५८ साली सातारच्या जिल्हा परिषदेने भाऊरावांना त्याच्या आजारपणाच्या स्थितीत मानपत्र देऊन सत्कार केला, त्यावेळी भाऊराव म्हणाले, ब्राह्मण समाजावर तरुणपणाच्या अविचारी अवस्थेत त्या काळास अनुसरून त्यांनी टीका केली; त्याबद्दल त्यांना पश्चाताप होतो आहे. आता हा वाद गाडून टाकला पाहिजे.” आंतरजातीय विवाह हा वाद मोडण्यास पूरक आहे अशी त्यांची धारणा असल्याने अश्या लग्नसमारंभास भाऊराव स्वतः हजर राहून वधूवरांना आक्रीर्वाद देत. आचार्य अत्र्यांच्या विवाहास ते हजर होते. कारण अत्र्यांचा तो विवाह आंतरजातीय होता.

    Digital Book 

    Original price was: ₹23.00.Current price is: ₹0.00.
  • -100%

    ज्ञानेश्वरीची प्रस्तावना आणि ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण

    1

    संपादकीय निवेदन

    इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांची “ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरींतील मराठी भाषेचे व्याकरण’ हे दोन ग्रंथ इ. स. १९०९ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर इ. स. १९६० साली महाराष्ट्र राज्यश्ञासनाने त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’चे पुनर्मुद्रण केले; पण ते करताना त्यांनी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना वगळली. वरील दोन्ही प्रकरणे, म्हणजे प्रस्तावना व व्याकरण, मराठी भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला बहुमोल असून ती दुर्मिळ झाल्याने]त्यांची एक संपादित आवृत्ती काढावी या हेतूने प्रस्तुत ग्रंथ प्रसिद्ध होत आहे. राजवाड्यांच्या मूळ प्रबंधांना तळटीपा, विषयसूची किंवा शब्दसूची यांची जोड नाही. ती येथे देऊन त्यांचे प्रबंध अधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्या प्रस्तावनेची व व्याकरणाची वैशिष्ट्ये सांगणारा एक विवेचक प्रस्तावही या जोडग्रंथास जोडला आहे. या कामी ‘साहित्य संस्कृती मंडळ’ने पुढाकार घेऊन हा ग्रंथ स्वतःचे प्रकाशन म्हणून प्रसिद्ध केला यासाठी मी ‘मंडळा’चा आभारी आहे.

    –  शं. गो. तुळपुळे , पुणें, ६ जून १९७८

    संपादकीय प्रस्तावना  राजवाडे-ज्ञानेश्वरी

    इतिहासाचार्य विश्वनाथ काश्लीनाथ राजवाडे यांनी त्यांना मराठवाड्यात बीड-पाटांगण येथे मिळालेली ज्ञानेश्वरीची पोथी तिला एक विस्तृत प्रस्तावना लिहून इ. स. १९०९ (शके १८३१) मध्ये प्रसिद्ध केली. त्याबरोबरच “ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण” हा आपला प्रबंधही त्यांनी त्याच वर्षी प्रसिद्ध केला. राजवाड्यांची ही ज्ञानेश्वरीची ‘प्रस्तावना’ व तिचे ‘व्याकरण’ त्यांच्या बुद्धिमत्तेची व व्यासंगाची साक्ष देत असून मराठी भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला त्यांचे वरील दोन्ही प्रबंध अमोल ठरले आहेत. ते प्रसिद्ध झाल्याला आता सत्तर वर्षे होत आली असून खुद्द राजवाड्यांना जाऊनही पन्नास वर्षे झाली आहेत. या कालावधीत मराठी भाषेचा अभ्यास पुष्कळच पुढे गेलेला असला तरी अजूनही राजवाड्यांची ‘ज्ञानेश्वरीची प्रस्तावना’ व त्यांचे ‘व्याकरण’ या जोडसाधनांचा उपयोग केल्यावाचून अभ्यासकाचे व संशोधकाचे पाऊल पुढे पडत नाही, इतके या दोन प्रबंधांचे महत्त्व आहे. आधुनिक भाषाभ्यासकांचा एक वर्ग राजवाड्यांच्या वरील कृतीकडे काहीशा उपेक्षेने पहात असतो हे खरे असले तरी ही परिस्थिती फार काळ टिकेल असे वाटत नाही. वर्णनात्मक (Descriptive)भाषाशास्त्राबरोबर ऐतिहासिक (Historical) भाषाशास्त्र म्हणून काही असते याची जाणीव जेव्हा आधुनिक अभ्यासकांना होईल– आणि ती हळूहळू होत आहे- तेव्हा या क्षेत्रात राजवाड्यांनी करून दाखविलेल्या कर्तृत्वाची यथार्थ कल्पना येऊन त्यांच्या ग्रंथाचे महत्त्व विद्वानांस अधिकाधिक पटत जाईल यात मुळीच शंका नाही. सध्या आपल्या या ‘जुन्या ठेवण्या’ वर काहीसे उपेक्षेचे सावट आले आहे, ही गोष्ट मात्र खरी. हे सावट दूर व्हावे व या प्रतिभावान्‌ भाषाक्ास्रज्ञाचे तेज पुन्हा उठून दिसावे हा प्रस्तुत संपादनामागील एक हेतू आहे.

    Digital Book

    Original price was: ₹90.00.Current price is: ₹0.00.
  • -100% महात्मा-गांधी-रविंद्रनाथ-ठाकुर

    महात्मा गांधी…रविंद्रनाथ ठाकुर

    0

    गुरूदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांच्या चिंतनामधून महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलू आणि वैशिष्ट्यांबद्दल आपणांस माहिती मिळते. हा एक वेगळा आणि मनस्वी अनुभव आहे. रवीन्द्रनाथांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांकडून महात्मा गांधींसारख्या श्रेष्ठ व्यक्तीबद्दल व्यक्‍त झालेले चिंतन हा भारतीय साहित्यसृष्टीचा अमोल ठेवा आहे.  मंडळाचा सुवर्णमहोत्सवाच्या प्रसंगी तो पुन्हा एकदा मराठी वाचकांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे. 

    रवीन्द्रनाथांसारख्या रसिक कविवर्याने महात्मा गांधींवर बंगालीत जे लिहीले आहे,  ते मराठीत प्रथमच प्रकाशित करण्याचा हा सुयोग. प्रा. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे संस्कृत, पाली, तिबेटी व बंगाली या भाषेवरील प्रभुत्व सर्वश्रुत आहे. त्यांनी करुन दिलेल्या ह्या भाषांतराचे ऋण न फिटणारे आहे.

    मधु मंगेश कर्णिक,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% हुतात्मा दामोदर हरि चाफेकर

    हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त

    0

    रॅन्डचा खून केल्यामुळे दामोदर हरि चापेकरांना फाशीची शिक्षा झाली असता ऑक्टोबर, १८९७ मध्ये येरवडा कारागृहात त्यांनी आपली सर्व हकिकत मोडीत लिहून ठेविली. श्री. वि. गो. खोबरेकर यांनी सदर मोडी हस्तलिखिताचे बालबोधीकरण व संपादन करून ते प्रकाशनासाठी मंडळाच्या स्वाधीन केले,  त्याकरीता मंडळ आभारी आहे. येरवडा कारागृहात असलेले हे मोडी बाड पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्याने मराठी वाचकास एका क्रांतिकारकाच्या मनाची तळमळ, त्यांनी आपल्या साध्याकरिता केलेली साधना याचा परिचय होईल आणि क्रातिकारकांवरील वाड़्मयात मोलाची भर पडली. 

    लक्ष्मणशास्त्री जोशी 

    २९ नोव्हेंबर, १९७४. अध्यक्ष.

    महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, मुंबई ३२.

    कार्तिक शुक्ल १५, १८९६

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100%

    पूज्य स्वामी रामानंदतीर्थ यांची दैनंदिनी

    0

    पी. व्ही. नरसिंह राव , 9, Motilal Nehru Marg,

    P. V. Narsimha Rao New Delhi 110011

    दिनांक : १ फेब्रुवारी २०००.

    श्री. वि. पां. देऊळगावकर यांनी संपादित केलेली “पू. स्वामी रामानंदतीर्थ यांची दैनंदिनी” स्वामीजींच्या विचारांचा, प्रगल्भ चिंतनाचा अमूल्य ठेवा आहे. या दैनंदिनीत स्वामीजींच्या शालीन व अष्टपैलू

    व्यक्तिमत्त्वाचा, खंबीर नेतृत्त्वाचा, त्यांच्या अंतरंगाचा आणि प्रामुख्याने निःस्वार्थ बुद्धीने, देशप्रेमाने प्रेरित होऊन केलेल्या विविध कार्याचा आढावा आहे. म्हणूनच ही दैनंदिनी वाचकांना उच्च विचारसरणीसाठी

    प्रेरणादायी तर ठरेलच, परंतु तरुण पिढीत, नवयुवकांत समर्पणाची भावना निर्माण करून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणू शकेल याची मला खात्री आहे.

    – दिनांक १ फेब्रुवारी २०००. पी. व्ही. नरसिह राव

    Original price was: ₹60.00.Current price is: ₹0.00.
  • -100% साने गुरुजी

    सेनानी साने गुरुजी

    0

    कोकणातला निसर्ग आणि खानदेशची माती व माणसे यांच्यावर गुरुजींनी निरतिशय प्रेम केले.

    अंतरीच्या उमाळ्याने गुरुजींनी लेखणीचा वापर केला त्याच उमाळ्याने त्यांनी आपली वाणीही वापरली. लेखणी आणि वाणी ही त्यांना त्यांच्या कार्यसिद्धीसाठी लाभलेली अमोघ अशी वरदानेच होती. ‘हा माणूस आपले जीवन, आपली सुखदुःखे, आपल्याच भाषेत, आपल्यापाशी तादात्म्य पावून अपरंपार सहानुभूतीने रंगवतो आहे’ असेच त्यांना भावले.

    याच उमाळ्याने शिक्षणाच्या क्षेत्रातही गुरुजी वावरले. ‘गुरुजी’ हे बिरुद त्यांच्याइतके महाराष्ट्रात अन्य कुणीही सार्थ केलेले नाही. तसे अंमळनेरच्या शाळेत श्रिक्षक म्हणून ते पाच-सहा वर्षेच होते. पण शाळेच्या चिमण्या जगाचा निरोप घेऊन राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतल्यावरसुद्धा त्यांनी आपली शिक्षकाची भूमिका कधी सोडली नव्हती. समाजशिक्षणाचे कार्य अनेक अंगांनी ते सतत करीतच राहिले आणि महाराष्ट्राचे गुरुजी बनले.

    साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड हा श्रद्धाशील समर्पणवृत्तीच्या प्रेमळ अशा आर्त भक्ताचाच होता. त्यांनी मानवावर आणि मानवेतर सुष्टीवरही अपार प्रेम केले. प्रेमधर्माचे ते यात्रिकच होते. ‘खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे’ ह्या तर्‍हेच्या प्रेमधर्माची पताका त्यांनी आयुष्यभर फडकवत ठेवली. गुरुजींनी आपल्या वागणुकीतून, शिकवणुकीतून सर्वत्र प्रेमधर्माची शिकवण दिली. प्रेमाच्या फडाचे ते फडकरीच होते. प्रेमाच्या दिडीचे ते दिडीकरच होते.

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% बालगंधर्व

    एक होता गंधर्व

    0

    एक होता गंधर्व

    – निवेदन – 

    “एक होता गँधर्व”ही आहे बालगंधर्वाची जीवनकथा. 

    नागपूरचे डॉ. राम म्हैसाळकर यांनी लिहिलेली .

    जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेली.

    मधमाशांच्या मधानं लदलदलेल्या पोळाप्रमाणं.

    बालगंधर्वाच्या आयुष्यातले चढउतार शब्दबद्ध करणारी.

    बालगंधर्वाचा आयुष्यपट उलगडून दाखविता दाखविता तत्कालीन कालपट उलगडून दाखविणारी.

    या कालपटातला संगीताच्या क्षेत्रातला वैभवकाळ चित्रीत करणारी.

    मराठी नाट्याच्या व संगीताच्या रसिकांना अनमोल खजिना उपलब्ध करून देणारी.

    भीज पाऊस मनोहर आहे असं नुसतं म्हणायचं नसतं.

    या भीजपावसात मनसोक्त भिजायचं असतं.

    चला, येताय ना भिजायला.

    रा. रं. बोराडे,  अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य साहित्य आणिसंस्कृती मंडळ 

    दिनांक : २०-९-२००१

    Digital Book

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% Dhondo keshav karve

    महर्षी धोंडो केशव कर्वे

    0

    अण्णासाहेबांना खंत होती, ती ही की स्वातंत्र्यानंतर समता आलेली नाही. समता आल्याशिवाय स्वातंत्र्याची खरी गोडी चाखता येणार नाही, असे ते म्हणत. महर्षी कर्वे यांनी कधीही तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला नाही किंवा लोकांना कोणता उपदेश केला नाही. कर्वे यांचे कार्य हाच कर्वे यांचा संदेश होता. ‘आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण झाडापर्यंत तरी जाईल’ या वचनाप्रमाणे कर्वे कार्य करीत राहिले.

    कर्वे यांच्या थोरवीबद्दळ आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ‘मी कोण आहे’ असा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला आणि त्याचे वस्तुनिष्ठ उत्तर स्वतःच शोधून काढले. म्हणूनच ते म्हणतात-“मी समाजकार्याला सर्वस्वी वाहून घेतले नाही. संसारी माणूस व संन्यासी वा त्यागी माणूस या दोघांच्या मधला मार्ग मी स्वीकारला. मी संसार नेटका केला नाही. कसाबसा करीत राहिलो. अजूनही करीत आहे. कुटुंबासाठी घरदार किंवा द्रव्यसंचय मी केला नाही. जरुरीपुरतेच वैयक्तिक व कौटुंबिक स्वार्थाकडे लक्ष देऊन बाकीचे सामर्थ्य व उर्वरित द्रव्य लोकहिताच्या कामी खर्चणे हा माझा स्वभाव बनला आहे.”स्वतः विषयीची वस्तुनिष्ठ जाणीव व स्वतःचे यथार्थ मूल्यमापन थोड्याच लोकांना करता आले. महर्षी कर्वे यांनी असे मूल्यमापन स्वतः केले.

    धर्म, नीतिशास्र आणि तत्त्वज्ञान यासंबंधी त्यांचे विचार पुरोगामी होते. त्यांचे सर्व आचरण धर्माधारित होते. हा धर्म कोणता? सद्‌विचारधर्म. अण्णासाहेबांनी धर्मविचारात आणि कर्माचरणात कर्मकांडाळा कधीच स्थान दिले नाही. त्यांचा मानसिक पिंड एखाद्या संन्याशासारखा अविचल आणि निर्विकार होता. 

    Original price was: ₹35.00.Current price is: ₹0.00.
  • -100% तंट्या-भिल्ल

    जननायक तंट्या भिल्ल

    0

    एकशे  पंचवीस वर्षापूर्वी आपल्याकडे इंग्रजांचा अंमल होता. आजच्या जळगाव-धुळे जिल्ह्यांस त्या काळात खानदेश म्हणत. खानदेझ्ञाला लागून वरच्या बाजूने सातपुडा डोंगराची रांग आहे. याला लागून होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिद्यांचा पूर्व निमाड हे भाग होते. खानदेश, होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिद्यांचा पूर्व निमाडची हद्द जळगाव जिल्ह्यातील पालजवळ मिळत होती. त्या भागात तंट्या भिल्लाचे गाव होते. माउंटअबूपासून सुरू होणारा विध्य, सातपुडा आणि बस्तरपर्यंतच्या डोंगराळ भागात आदिवासींची मोठी वस्ती आहे. यातच भिल्लांची मोठी संख्या आहे.

    मराठेझाहीचा १८१८ साली अस्त झाला. परंतु त्या काळात सातपुडातील बहादुर भिल्लांनी अनेक वर्षे गनिमी काव्यानं इंग्रजांशी झुंज दिली. सातपुडा, सातमाळा, अजिंठ्याच्या डोंगरांतील अनेक भिल्ल नायकांनी इंग्रजांशी प्रखर लढा दिला. ह्यात सातमाळातील भागोजी नाईक, सातपुडातील कजरसिंग नाईक, भिमा नाईक आणि तंट्या भिल्लाचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काही सोनेरी पाने आहेत.

    भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाप्रमाणेच या आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहासही महत्त्वाचा  आहे. बलाढ्य ब्रिटिझञ सत्तेला अकरा वर्ष सळो की पळो करणारा तंट्या भिल्ल हा

    ज्या काळात होळकर, निजाम, झिंदे अन्‌ इतर संस्थानिक ब्रिटिझ सत्तेची हुजरेगिरी करण्यात मशगुल होते, त्या काळात हा लोकविलक्षण नायक जनाधारावर झुंजत होता. अकरा वर्ष ब्रिटिश सत्तेच्या तोंडचे पाणी तंट्याने पळविले. त्याची एकाकी झुंज आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातील एक सोनेरी पान आहे. 

    Digital Book

    Original price was: ₹45.00.Current price is: ₹0.00.
  • -100% अहिल्याबाई

    तेजस्विनी अहिल्याबाई होळकर

    0

    ही तर रणरागिणी प्रजा वत्सल राणी 

    ज्या समाज रचनेत कोणतीही उन्नतीची साधने स्रियांना उपलब्ध नसताना, त्याकाळी या महान कर्तृत्व शालिनीने “पति’ बरोबर “सति” न जाता प्रजापालन करण्यासाठी जीवन जगण्याचा स्वीकार केला!!  ही प्रजा वत्सल राणी जनमानसाच्या डोळ्यातील पाणी पुसणारी खरी लोकमंगल माता झाली!!  संपूर्ण भारतात त्यांचे नांव अत्यंत श्रद्धेने गौरवले गेले आहे. अत्यंत समृद्ध अशा राज्याची स्वामीनी असूनही आपली सर्व संपत्ती लोककल्याणार्थ खर्च केली. मंदिरे आणि तीर्थस्थाने यांना संरक्षण दिले. भारतीय शिल्प, कला, साहित्य आणि संस्कृती यांची अमोल सेवा केली. भारताच्या राज्य प्रशासनात त्यांच्या कार्याचे स्थान अढळ आहे. सर्व स्वकीयांना इंग्रज फिरंग्या विरुद्ध एकत्र होण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांनी पुढील संकट ओळखले होते – अशी दूरदृष्टी – अशी प्रजा वत्सल समदहृष्टी आणि कर्तृत्व सृष्टी – असलेल्या अहिल्या देवीचे या महान लोकमातेचे चरित्राचे  वाचक वर्ग उत्साहाने स्वागत करतील अज्ञी आशा  आहे. 

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% पठ्ठे बापुराव

    लोकशाहीर पठ्ठे बापूराव

    0

    ज्या काळात रंजन आणि प्रबोधन लोककलाच करत, त्या काळी लोकसंस्कृती आणि लोकजीवनाला उत्साहवर्धित प्रेरणा देण्याचे आत्यंतिक महत्त्वाचे कार्य तमाशा या मराठामोळ्या लोककलेने केले आहे. खेड्यापाड्यांतील वर्षभराच्या शिणलेल्या, मरगळलेल्या लोकजीवनाला एक नवे चैतन्य लाभे. या लोककलाकारांनी, लोकशाहिरांनी सामाजिक स्तरावर सांस्कृतिक जडणघडण केली आहे. पेशवेकालीन शाहिरांच्यानंतर तमाशा कला मंदावली होती; पण पठ्ठे बापूरावांसारखा शीघ्रकवी या कलेची ब्रत म्हणून सेवा करायला लागल्यानंतर त्यांच्या तमाशांनी अवघ्या महाराष्ट्राला वेडे केले. त्यांनी तमाशा कला कळसाला नेऊन पोचवली. त्या कलेला नवा प्राण दिला. तमाशा कला ही त्यांच्या जीवनाचा श्वास बनली होती. त्यांनी लोकरंजनाबरोबर लोकप्रोबधन करण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले. संसार मोडला. उच्चवर्णीय असूनही समाजाची पर्वा बाळगली नाही. गावाने बहिष्कृत केले तरी पठ्ठे बापूरावांनी हाती घेतलेला लोकजागराचा डफ खाली ठेवला नाही. त्यांच्या लेखणीने आणि वाणीने तमाशा कलेला बहर आला. एकदा म्हटलेली लावणी उद्या म्हणायची नाही, लावणी लिहिण्यासाठी एकदा कागदावर लेखणी ठेवली, की लावणी संपल्याशिवाय उचलायची नाही, शिळ्या पैशाचे तोंड पाहायचे नाही अशा या लोकविलक्षण शाहिराच्या लोकविलक्षण प्रतिज्ञा होत्या. संपूर्ण आयुष्यच त्यांनी तमाशा कलेला वाहिले होते. त्यांनी दोन लाखांहून जास्त लावण्या लिहिल्या ही घटनाही जगावेगळी होती.  आजही पठ्ठे बापूरावांच्या गण, गौळणी आणि लावण्यांशिवाय तमाशाची भैरवी होत नाही. 

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.