Availability: Out of Stock

नामदेव गाथा

SKU: MH14

0.00

Store
0 out of 5

श्रीभक्‍त शिरोमणी संत नामदेव महाराजांची भक्‍तिज्ञाननिष्ठा आणि अपूर्व व्यक्तिमत्त्व

महाराष्ट्रीय संतमंडळींत श्री नामदेव महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांची श्रीविठ्ठलेशावरील भक्‍ती निस्सीम व पराकोटीची होती, हे महाराष्ट्रांत सर्वश्रुत आहे. श्रीज्ञानराज माउलींनी महाराष्ट्रांत भागवत धर्माचा अर्थात वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि वारकरी भक्‍तिमार्गाला जे तत्त्वज्ञानाचे भक्‍कम अधिष्ठान दिले त्या संप्रदायाचा प्रचार व प्रसार श्रीनामदेव महाराजांनी येथे धडाडीने केला, हे सर्वांना ठाउकी आहे; पण हा प्रसार त्यांनी केवळ या महाराष्ट्रापुरता सीमित केला नाहीं ; तर तो उत्तर भारतांतही केला. श्रीविठ्ठलाला सोडून पंढरपुराबाहेर तीर्थयात्रेलाही जाण्यास तयार नसलेल्या श्रीविठ्ठलाच्या एकनिष्ठ भक्ताने गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश अशा अनेक प्रांतांतील शहरांत व खेड्यांत भागवत धर्माची पताका फडकावली ; एवढेच नव्हे तर आपल्या उत्तर आयुष्यांत ‘पंजाब’ ही आपली कर्मभूमी ‘ व दीड तपाहून अधिक काळ तेथे राहून, त्या प्रांतांत व आसमंतातील प्रदेशांत भागवत धर्माच्या “भक्‍ति-ज्ञानाची गंगा” नेऊन परकीय स्वाऱ्या व आक्रमणांनीं होरपळून निघालेल्या जनतेला  “अमृत-संजीवनी” दिली, तेथील जनतेत नवचैतन्य ओतले आणि स्वधर्म रक्षणाकरिता सिद्ध राहण्याची केवढी व कशी तयारी केली, याची महाराष्ट्रांत घ्यावी तेवढी दखल अद्यापिही घेतली नाहीं. पंढरीच्या वाळवंटांतील विठ्ठल नामाचा गजर आणि भागवत धर्माच्या “ भक्ति-ज्ञाना ” चे रहस्य श्रीनामदेव महाराजांनीं उत्तरेतही कसे गाजविले, हे कळून येते ; पण याचा उद्घोष महाराष्ट्रांत जितका व्हावा तितका अद्यापि झालेला नाहीं. ती माहिती व श्रीनामदेव महाराजांचे संपूर्ण ‘व्यक्तिमत्त्व’ व कार्य ‘ आपल्यास येथे थोडक्यात पाहावयाचे आहे.

श्रीपुंडलिक रायांनीं श्रीविठ्ठलाला विटेवर उभे केले; त्या दैवताचा संप्रदाय व वारी श्रीज्ञानदेव महाराज व श्रीनामदेव महाराज यांच्या उदयापूर्वी सुमारे दोनशे-तीनशे वर्षे तरी असावी असे इतिहास संशोधकांचे मत आहे. त्यांच्यापूर्वी श्रीमदाधशंकराचार्य यांनी एक “ श्री पांडुरंगाष्टक ” लिहिले आहे; ते सर्वजन प्रसिद्ध आहे. त्याचेळी आजच्या संप्रदायाची शान, मान व प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी महानुभाव व लिंगायत पंथही आपल्या संप्रदायाचा प्रचार करीत होते. ते दोन्हीही पंथ अवैदिक असल्याने व वैदिक तत्त्वज्ञानाची त्यांना बैठक नसल्याने शिवाय महानुभाव पंथांत त्यांच्या लिपीची दुर्बोधता व विचाराची गुप्तता असल्याने जनमानसावर त्यांची छाप पडत नसे. हेमाद्री, रोप देवासारखी पंडित मंडळी संस्कृत धर्मग्रंथावर संस्कृत भाषेतच टीका करीत अगर ग्रंथरचना करीत ; ह्यामुळें प्राकृत जनांना त्याचा काही उपयोग नव्हता. आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारा व जनमानसांत चैतन्याचा संचार करणारा असा जोमदार पंथ उदयास आला नव्हता; ही उणीव भरून काढणारा “भागवत धर्माच्या भक्ति-ज्ञानाचा दीप श्रीसंत ज्ञानदेव आणि श्रीसंत नामदेव यांनी उजळला आणि जनतेला अंधारातून प्रकाशात-ज्ञान प्रकाशात आणिले.” 

Book info

श्रीनामदेव
1200

Out of stock

  Ask a Question

Description

निवेदन

“नामदेव गाथा”  हे महाराष्ट्राचे उच्च कोटीचे सांस्कृतिक धन आहे. श्री नामदेव महाराजांनी भागवत धर्माची ध्वजा महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर उत्तर भारतातही फडकत ठेवली व मराठी संतांचा भक्तिमार्ग, अध्यात्म आणि ईश्वरनिष्ठा यांचा प्रत्यय महाराष्ट्रावाहेरील समाजाला करून दिला. “ नामदेव गाथा” ही रसाळ व प्रासादिक रचना श्रीनामदेवांच्या भक्तवत्सल वाणीतून प्रगट झाली व गेल्या अनेक पिढया महाराष्ट्राने ती शिरोधार्य मानली. श्रीनामदेव महाराजांचे विठ्ठल हे आराध्यदैवत व श्रीज्ञानेश्वर माउली हे जणू परम दैवत ! नामदेव महाराजांनी त्यांची परोपरीनी आपल्या गाथेमध्ये आळवणूक केलेली आहे. अशी ही नामदेव विरचित गाथा महाराष्ट्राला नव्याने उपलब्ध करून देण्याचे महत्कार्य महाराष्ट्र शासनाने अंगीकारले व गाथेची आवृत्ती अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध केली. त्यानंतर आता त्या गाथेचे पुनर्मुद्रण महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे करण्यात येत आहे. हेतू हा की, श्रीनामदेवांची ही अनुपम रचना पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुलभपणे उपलब्ध व्हावी.

श्री. किसनमहाराज साखरे हे भागवत धर्माचे निष्ठावंत उपासक आणि श्रीज्ञानेश्वरी, श्रीनामदेव गाथा यांवर अधिकारी वृत्तीने भाष्य करणारे श्रेष्ठ भक्त. श्रीनामदेव गाथेच्या या आवृत्तीला त्यांनी प्रस्ताचनापर मजकूर लिहावा, अशी आम्ही त्यांना प्रेमाची विनंती केली. श्री. किसनमहाराज साखरे यांनी ती आपल्या भक्तिमार्गाला अनुसरून तत्परतेने स्वीकारली आणि सुबोध, निरूपणात्मक प्रस्तावना लिहून दिली. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच होतील. श्रीनामदेव गाथेची ही नवी आवृत्ती महाराष्ट्रातील घराघरातून आदरपूर्वक संग्रहित केली जाईल व तिचें वाचन, मनन, चिंतन महाराष्ट्राला भक्तिमार्गाचा पुन:प्रत्यय देईल, असा मला विश्र्वास वाटतो.

या नामदेव गाथेची सुसंगत अनुक्रमणिका तयार करण्याचे काम महत्त्वाचे होते. मराठीतील ज्येष्ठ कवी प्रा. शंकर वैद्य (मंडळाचे तत्कालीन सदस्य) यांनी हे काम परिश्रमपूर्वक व तत्परतेने पार पाडले. याबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे.

मधु मंगेश कर्णिक,

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

दिनांक : २३ एप्रिल २००८. महाराष्ट्र राज्य साहित्य

उपदेश 

ऐका कलियुगाचा धर्म । पुत्र सांगे पितयास काम ।
ब्राह्मण त्यजिती ब्रह्मकर्म । ऐसें वर्तमान मांडले ॥ १॥
माया बहिणी दवडिती । स्त्री आपुली आणविती ।
ऐका ऐका नवल गती । अगा श्रीपति परियेसी ॥२॥
भार्या न करिती पतिची सेवा । नाहीं कवणा धर्माचा हेवा ।
वतंतसे पापाचा ठेवा । अगा केशवा परियेसी ॥३॥
अरे वैराग्याचा घराचारू । आणि संन्यासा मोह थोरू ।
संता बहुत अहंकारू । रुसणें न लगे कोणासी ॥४॥
जाला कलिचा प्रवेशु । 'तुम्हां नामाचा विश्वासु ।             
हृदयीं हृषिकेशु । विष्णुदास नामा म्हणे ॥ ५॥
Please follow and like us:
Pin Share

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नामदेव गाथा”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.