• -100%

    पूज्य स्वामी रामानंदतीर्थ यांची दैनंदिनी

    0

    पी. व्ही. नरसिंह राव , 9, Motilal Nehru Marg,

    P. V. Narsimha Rao New Delhi 110011

    दिनांक : १ फेब्रुवारी २०००.

    श्री. वि. पां. देऊळगावकर यांनी संपादित केलेली “पू. स्वामी रामानंदतीर्थ यांची दैनंदिनी” स्वामीजींच्या विचारांचा, प्रगल्भ चिंतनाचा अमूल्य ठेवा आहे. या दैनंदिनीत स्वामीजींच्या शालीन व अष्टपैलू

    व्यक्तिमत्त्वाचा, खंबीर नेतृत्त्वाचा, त्यांच्या अंतरंगाचा आणि प्रामुख्याने निःस्वार्थ बुद्धीने, देशप्रेमाने प्रेरित होऊन केलेल्या विविध कार्याचा आढावा आहे. म्हणूनच ही दैनंदिनी वाचकांना उच्च विचारसरणीसाठी

    प्रेरणादायी तर ठरेलच, परंतु तरुण पिढीत, नवयुवकांत समर्पणाची भावना निर्माण करून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणू शकेल याची मला खात्री आहे.

    – दिनांक १ फेब्रुवारी २०००. पी. व्ही. नरसिह राव

    Original price was: ₹60.00.Current price is: ₹0.00.
  • -100% महात्मा-गांधी-रविंद्रनाथ-ठाकुर

    महात्मा गांधी…रविंद्रनाथ ठाकुर

    0

    गुरूदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांच्या चिंतनामधून महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलू आणि वैशिष्ट्यांबद्दल आपणांस माहिती मिळते. हा एक वेगळा आणि मनस्वी अनुभव आहे. रवीन्द्रनाथांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांकडून महात्मा गांधींसारख्या श्रेष्ठ व्यक्तीबद्दल व्यक्‍त झालेले चिंतन हा भारतीय साहित्यसृष्टीचा अमोल ठेवा आहे.  मंडळाचा सुवर्णमहोत्सवाच्या प्रसंगी तो पुन्हा एकदा मराठी वाचकांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे. 

    रवीन्द्रनाथांसारख्या रसिक कविवर्याने महात्मा गांधींवर बंगालीत जे लिहीले आहे,  ते मराठीत प्रथमच प्रकाशित करण्याचा हा सुयोग. प्रा. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे संस्कृत, पाली, तिबेटी व बंगाली या भाषेवरील प्रभुत्व सर्वश्रुत आहे. त्यांनी करुन दिलेल्या ह्या भाषांतराचे ऋण न फिटणारे आहे.

    मधु मंगेश कर्णिक,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% मराठा कालखंड १७०७ - १८१८

    महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड (भाग २) १७०७ ते १८१८

    0

    लेखकाचे हृद्गत

    मराठ्यांच्या इतिहासापैकी थोरले शाहू महाराजांपासून पेशवाई अखेरच्या कालखंडाचा इतिहास लिहिण्याचे काम महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने माझ्यावर सोपविले होते. ह्या कालखंडाचा इतिहास आपल्या पूर्वजांनी शौर्य, वीर्य, तेज आदी गुण दाखवून घडविला, त्याबद्दल आपण सर्व महाराष्ट्रीयांस जास्त आपुलकी व जवळीक वाटते व तो इतिहास सर्वाना आवडतो.

    पेशवा कालखंड लिहित असता या सर्व कालखंडांचा इतिहास ७०० पृष्ठात सामाविला जाईल असा प्रयत्न या ठिकाणी मी केला आहे. ह्या कालखंडातील पेशवे व शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन आदी मातब्बर सरदार या एकेकट्यांचा साद्यंत इतिहास लिहावयाचा तर त्यासही ७०० पृष्ठे खर्ची पडतील, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे हे वीर पुरुष आहेत. अशा परिस्थितीत हा इतिहास लिहिताना मला नाइलाजास्तव बरीच काटछाट करावी लागली आहे. थोरले बाजीराव, महादजी शिंदे, होळकर यांच्या पराक्रमांचे वर्णन करताना सर्व शरीर रोमांचित होते आणि दुसरा बाजीराव, दौलतराव शिंदे व उत्तर कालातील मराठे सरदारांना एकएकटे गाठून इंग्रजांनी त्यांचा केलेला पराभव हे लिहित असता मन उद्विग्न होते व रडू कोसळते. असा हा हर्षामहर्षाचा मराठी राज्याचा इतिहास माझ्या हातून लिहून पुरा करून घेतला, ह्याबद्दल त्या जगन्नियंत्याचे मी आभार मानतो. एवढे मोठे काम एकहाती करत असता काही उणिवा व चुका होणे अपरिहार्य आहे ह्याची जाणीव मला आहे.

    – लेखक 

    प्रस्तुत खंडाचे लेखन डॉ. खोबरेकर यांनी केले असून या कालखंडात इ. स. १७०७ ते १८१८ पर्यंतचा इतिहास देण्यात आला आहे. उपलब्ध नवीन संदर्भ व संशोधन यावरून हे लेखन डॉ. खोबरेकर यांनी केले असून वाचक या एकत्रित इतिहासाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

    Digital Book

    Original price was: ₹500.00.Current price is: ₹0.00.
  • -100% शिवकाल (१६३० ते १७०७)

    महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग १ (शिवकाल)

    0

    शिवकाल (इ. स. १६३०—१७०७)

    सिहावलोकन

    येथपर्यंत शिवशाही संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि राणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाचे कथन उपलब्ध माहितीच्या आधाराने साधेल तेवढे सुसंगत केले आहे.

    शहाजी महाराज अभूतपूर्व प्रयोग आणि असामान्य कर्तृत्व करून परक्यांचे राज्य टिकविण्यासाठी झटले व नंतर स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या बापाच्या पराक्रमाच्या कथा आपल्या मातोश्रीकडून ऐकून बाल शिवरायांनी ठरविले की आपण आपले स्वतःचे राज्य उभार. ह्या विचारास वडील शहाजी महाराज, मातोश्री जिजाबाई, आणि इतर हितचिंतकांनी उचळून धरले. त्यावेळी शहाजी महाराज वडीलपुत्र संभाजीराजे यांसह बंगलोरास होते.

    त्याकरिता शहाजी महाराजांनी संभाजीराजे व शिवरायास दोन वर्षे बंगलोरात प्रशिक्षण देऊन त्यांना स्वराज्य स्थापण्यासाठी प्रखर ध्येयवादी बनविले. पुण्यास गेल्यावर बारा मावळातील लोकांच्या सुख-दुःखाशी समरस होऊन त्यांची मैत्री संपादन करणे व वतनदारांचा बंदोबस्त करणे ही दोन कामे शहाजी महाराजांनी शिवरायास सुचविली होती. 

    शिवरायांच्या बालपणी इस्लामी परधर्मीयांचे राज्य महाराष्ट्रात सर्वत्र होते. त्यावेळी हिंदू प्रजा सर्वार्थाने परदास्यात पिचत होती. हिंदूना बाटवून त्यांना इस्लाम धर्माची दीक्षा देणे, त्यांची मंदिरे, मूर्ती वगैरे श्रद्धास्थाने उद्‌ध्वस्त करणे, हिंदू स्रियांचे अपहरण इत्यादी अनेक अत्याचारांना मुस्लिम राज्यात हिंदू प्रजा तोंड देत होती. हे श्रिवरायांनी लहानपणी पाहिले आणि स्वजनांचे स्वतंत्र राज्य स्थापावयाचे ठरविले. त्याकरिता त्यांनी नियोजनपूर्वक साहसे केली. जीवन मरणाचे लढे दिले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आपणांस राज्याभिषेक करवून घेतला. परदास्यात पिळल्या जाणाऱ्या विस्कळीत अशा हिंदू समाजाची जमेल तेवढी एर्कोजूट करण्याचे महाराजांनी आपले धोरण ठरविले.

    “हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे” असे महाराज तत्कालीन देशपांडे व वतनदार वीर यांना आपल्या स्वराज्यसिद्धीच्या संकल्पनेत सामील करून घेण्यासाठी सांगत असत. यावरून त्यांच्या संकल्पनेस ईश्वराचे अधिष्ठान होते. इ. स. १६४६ त शिवरायांनी जी मुद्रा पत्रावर केली ती स्वतःच्या राज्याभिषेकानंतरही चाळू ठेवली होती. “प्रतिपचंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते!” म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढणारी आणि विश्वाने वंदिलेली असून विश्वकल्याणासाठीच तिचे अस्तित्व आहे, ही मुद्रा त्यांनी संस्कृत भाषेत केली.

    शिवरायांनी परकीय राज्यकर्त्यांचे धार्मिक आणि राजकीय आक्रमण थांबून धरण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा एकच रामबाण तोडगा आहे, अज्ञी शिकवण तत्कालीन महाराष्ट्रीयांस दिली व स्वराज्याची स्थापना केली.

    स्वराज्य संपादनाचे काम चाळू असता महाराजांनी स्वराज्यातील ठिकठिकाणच्या साधूसंतांच्या भेटी घेतल्या. तसेच अनेक प्रसंगी मंदिरांना व मठांना मुद्दाम भेटी दिल्या. त्या काळात धार्मिक स्थाने ही जनतेची श्रद्धास्थाने होती. तिथल्या भेटीत तेथे जमणाऱ्या सामान्यजनांचा संपर्कही त्यांना साधता येत असे. शिवकालीन पत्रसारसंग्रहात ब्राह्मणास वर्षासने, अग्रदान, दान व इनाम दिल्याची अनेक पत्रे आहेत. त्यापैकी काही पत्रे सारांशरूपाने इथे दिली आहेत. इ. स. १६५३ मध्ये वेदमूर्ती गोपाळ भट यांनी मातोश्री जिजाबाईनना मंत्रोपदेश दिला. त्याबद्दल त्यांना वर्षासन व दानपत्र देण्यात आले. जुलै १६५३ त महाराजांनी सिद्धेश्वर भट यांना त्यांच्या अनुष्ठानबळे आपण राजाधिकारी जालो म्हणून वर्षासन दिले. १६५६ साली दोन काजींना तत्पूर्वी तुटलेली सनद चालू केली, हजरत पीराला इनामती शेतीची सनद दिली. तसेच १६७१ साली आळंदी येथील ज्ञानदेवाच्या मंदिरास इनाम दिले इ. स. १६७७ त चिंचवड देवस्थानातील अन्नखर्च भागविण्यासाठी वतन इनाम दिले. तिरुपती व चिपळूणजवळील परशुराम क्षेत्रास महाराजांनी वर्षासने दिली होती.

    Digital Book

    Original price was: ₹275.00.Current price is: ₹0.00.
  • -100% साने गुरुजी

    सेनानी साने गुरुजी

    0

    कोकणातला निसर्ग आणि खानदेशची माती व माणसे यांच्यावर गुरुजींनी निरतिशय प्रेम केले.

    अंतरीच्या उमाळ्याने गुरुजींनी लेखणीचा वापर केला त्याच उमाळ्याने त्यांनी आपली वाणीही वापरली. लेखणी आणि वाणी ही त्यांना त्यांच्या कार्यसिद्धीसाठी लाभलेली अमोघ अशी वरदानेच होती. ‘हा माणूस आपले जीवन, आपली सुखदुःखे, आपल्याच भाषेत, आपल्यापाशी तादात्म्य पावून अपरंपार सहानुभूतीने रंगवतो आहे’ असेच त्यांना भावले.

    याच उमाळ्याने शिक्षणाच्या क्षेत्रातही गुरुजी वावरले. ‘गुरुजी’ हे बिरुद त्यांच्याइतके महाराष्ट्रात अन्य कुणीही सार्थ केलेले नाही. तसे अंमळनेरच्या शाळेत श्रिक्षक म्हणून ते पाच-सहा वर्षेच होते. पण शाळेच्या चिमण्या जगाचा निरोप घेऊन राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतल्यावरसुद्धा त्यांनी आपली शिक्षकाची भूमिका कधी सोडली नव्हती. समाजशिक्षणाचे कार्य अनेक अंगांनी ते सतत करीतच राहिले आणि महाराष्ट्राचे गुरुजी बनले.

    साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड हा श्रद्धाशील समर्पणवृत्तीच्या प्रेमळ अशा आर्त भक्ताचाच होता. त्यांनी मानवावर आणि मानवेतर सुष्टीवरही अपार प्रेम केले. प्रेमधर्माचे ते यात्रिकच होते. ‘खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे’ ह्या तर्‍हेच्या प्रेमधर्माची पताका त्यांनी आयुष्यभर फडकवत ठेवली. गुरुजींनी आपल्या वागणुकीतून, शिकवणुकीतून सर्वत्र प्रेमधर्माची शिकवण दिली. प्रेमाच्या फडाचे ते फडकरीच होते. प्रेमाच्या दिडीचे ते दिडीकरच होते.

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% हुतात्मा दामोदर हरि चाफेकर

    हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त

    0

    रॅन्डचा खून केल्यामुळे दामोदर हरि चापेकरांना फाशीची शिक्षा झाली असता ऑक्टोबर, १८९७ मध्ये येरवडा कारागृहात त्यांनी आपली सर्व हकिकत मोडीत लिहून ठेविली. श्री. वि. गो. खोबरेकर यांनी सदर मोडी हस्तलिखिताचे बालबोधीकरण व संपादन करून ते प्रकाशनासाठी मंडळाच्या स्वाधीन केले,  त्याकरीता मंडळ आभारी आहे. येरवडा कारागृहात असलेले हे मोडी बाड पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्याने मराठी वाचकास एका क्रांतिकारकाच्या मनाची तळमळ, त्यांनी आपल्या साध्याकरिता केलेली साधना याचा परिचय होईल आणि क्रातिकारकांवरील वाड़्मयात मोलाची भर पडली. 

    लक्ष्मणशास्त्री जोशी 

    २९ नोव्हेंबर, १९७४. अध्यक्ष.

    महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, मुंबई ३२.

    कार्तिक शुक्ल १५, १८९६

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम

    हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम (काही आठवणी)

    0

    प्रस्तावना 

    हैदराबादचा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे पान. निझाम आणि इत्तिहाद्‌उलू मुस्लिमीन यांच्या रझाकारी शोषणापासून आणि अत्याचारापासून ज्यांनी हैदराबादला मुक्त करण्याकरिता अटीतटीचे प्रयत्न केले त्या स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, काजीनाथराव वैद्य, केशवराव कोरटकर, के. व्ही. नरसिंहराव, अच्युतभाई देशपांडे, रघुनाथराव रांजणीकर, सीताराम पप्पू, विजेंद्र कावरा या मंडळींच्यावरोबर ‘हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम’या ग्रथांचे लेखक शंकरभाई पटेल यांनी काम केले आहे. जेव्हा एखादा प्रसिद्ध इतिहास लिहिला जातो तेव्हा त्यात काही खरे, काही खोटे येऊ शकते. अशा वेळी भिन्न मताच्या लोकांनी मांडलेला इतिहास जपून ठेवणेही आवश्यक असते. हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामावर वसंत पोतदार यांनीही ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात अनेक चुका आहेत असे शंकरभाई पटेल यांचे म्हणणे. हीच गोष्ट अच्युत खोडवे यांना पण जाणवली. माझे मित्र अनंतराव भालेराव यांनी याच लढ्यावर “पेटलेले दिवस’ नावाचे पुस्तक लिहिले. उमरी बँक लुटण्याची घटना आणि नांदेडमधील चाउस इत्यादींच्या संबंधातल्या असलेल्या घटनांचा त्यांनी उल्लेख केला. आमचे दुसरे मित्र रघुनाथराव रांजणीकर यांना अनंतराव यांच्या कथनात काही त्रुटी जाणवल्या. वस्तुस्थिती अशी असते की, एखाद्या प्रदेशाचा इतिहास जेव्हा लिहिला जातो तेव्हा निरनिराळे इतिहासकार आणि त्या घटनेचे साक्षीदार यांनासुद्धा त्या इतिहासाचे सगळेच पापुद्रे माहीत नसतात आणि त्यांना त्यामुळे या घटनांत वेगवेगळा अर्थ जाणवतो. अशा वेळी ज्यांना जे सांगावयाचे आहे त्यांचे एकदा सांगून होणे महत्त्वाचे ठरते. कारण इतिहास म्हणून जे सांगितले जाते ते इतिहासाचे साधनमात्र असते. त्यामुळे जे जे हैदराबादवर इतिहास लिहिले गेले ते केवळ स्वकपोलकल्पित असले तरी ते प्रसिद्ध केले पाहिजेत असे मला वाटते.  

    यादृष्टीने अनंतराव भालेराव, वसंत पोतदार यांचे ग्रंथ महत्त्वाचे आहेतच. तसेच शंकरभाई पटेल यांच्या ग्रंथालाही ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्त्व आहे. उद्या श्री. सीताराम पप्पू किंवा दामोदर पांगरेकर किंवा के. व्ही. नरसिंहराव आदी लोक हैदराबाद स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहितील तेव्हा त्यालाही एक महत्त्व राहणार आहे. शंकरभाई पटेल हे एक मोठे कार्यकर्ते. त्यांचा अनुभव फार मोलाचा. शंकरभाई यांचे वय आता बरेच झाले आहे. त्यांनी यावेळी हा ग्रंथ लिहून पुढील पिढीवर मोठे उपकार करून ठेवले आहेत. आपला अनुभव पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हेही एक मोठे समाजकार्यच असते. ते शंकरभाई पटेल यांनी पुरे केले आहे. आपले लेखन हे आपल्या अपत्यासारखे असते. आपले मूल वेळीच घरी परतले नाही तर आईच्या मनात हुरहूर लागते. या पुस्तकास विलंब लागत आहे असे पाहून शंकरभाईंनाही हुरहूर लागणे स्वाभाविक आहे. पण लेखनानंतरच्या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असतो. शंकरभाई पटेल यांच्या ग्रंथ-प्रकाशनास विलंब लागला, त्यास साहित्य आणि संस्कृती मंडळाचा नाईलाज होता. हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात मंडळाकडून कोणतीही कुचराई झाली नाही असे मी शंकरभाई पटेल यांना आश्वासन देतो. हा ग्रंथ प्रसिद्ध करताना मंडळास आनंद होत आहे हे सांगणे नकोच.

    सुरेन्द्र बारलिंगे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

    २ ऑक्टोबर १९८६

    Digital Book

    Original price was: ₹125.00.Current price is: ₹0.00.