• -100%

    ज्ञानेश्वरीची प्रस्तावना आणि ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण

    1

    संपादकीय निवेदन

    इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांची “ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरींतील मराठी भाषेचे व्याकरण’ हे दोन ग्रंथ इ. स. १९०९ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर इ. स. १९६० साली महाराष्ट्र राज्यश्ञासनाने त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’चे पुनर्मुद्रण केले; पण ते करताना त्यांनी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना वगळली. वरील दोन्ही प्रकरणे, म्हणजे प्रस्तावना व व्याकरण, मराठी भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला बहुमोल असून ती दुर्मिळ झाल्याने]त्यांची एक संपादित आवृत्ती काढावी या हेतूने प्रस्तुत ग्रंथ प्रसिद्ध होत आहे. राजवाड्यांच्या मूळ प्रबंधांना तळटीपा, विषयसूची किंवा शब्दसूची यांची जोड नाही. ती येथे देऊन त्यांचे प्रबंध अधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्या प्रस्तावनेची व व्याकरणाची वैशिष्ट्ये सांगणारा एक विवेचक प्रस्तावही या जोडग्रंथास जोडला आहे. या कामी ‘साहित्य संस्कृती मंडळ’ने पुढाकार घेऊन हा ग्रंथ स्वतःचे प्रकाशन म्हणून प्रसिद्ध केला यासाठी मी ‘मंडळा’चा आभारी आहे.

    –  शं. गो. तुळपुळे , पुणें, ६ जून १९७८

    संपादकीय प्रस्तावना  राजवाडे-ज्ञानेश्वरी

    इतिहासाचार्य विश्वनाथ काश्लीनाथ राजवाडे यांनी त्यांना मराठवाड्यात बीड-पाटांगण येथे मिळालेली ज्ञानेश्वरीची पोथी तिला एक विस्तृत प्रस्तावना लिहून इ. स. १९०९ (शके १८३१) मध्ये प्रसिद्ध केली. त्याबरोबरच “ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण” हा आपला प्रबंधही त्यांनी त्याच वर्षी प्रसिद्ध केला. राजवाड्यांची ही ज्ञानेश्वरीची ‘प्रस्तावना’ व तिचे ‘व्याकरण’ त्यांच्या बुद्धिमत्तेची व व्यासंगाची साक्ष देत असून मराठी भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला त्यांचे वरील दोन्ही प्रबंध अमोल ठरले आहेत. ते प्रसिद्ध झाल्याला आता सत्तर वर्षे होत आली असून खुद्द राजवाड्यांना जाऊनही पन्नास वर्षे झाली आहेत. या कालावधीत मराठी भाषेचा अभ्यास पुष्कळच पुढे गेलेला असला तरी अजूनही राजवाड्यांची ‘ज्ञानेश्वरीची प्रस्तावना’ व त्यांचे ‘व्याकरण’ या जोडसाधनांचा उपयोग केल्यावाचून अभ्यासकाचे व संशोधकाचे पाऊल पुढे पडत नाही, इतके या दोन प्रबंधांचे महत्त्व आहे. आधुनिक भाषाभ्यासकांचा एक वर्ग राजवाड्यांच्या वरील कृतीकडे काहीशा उपेक्षेने पहात असतो हे खरे असले तरी ही परिस्थिती फार काळ टिकेल असे वाटत नाही. वर्णनात्मक (Descriptive)भाषाशास्त्राबरोबर ऐतिहासिक (Historical) भाषाशास्त्र म्हणून काही असते याची जाणीव जेव्हा आधुनिक अभ्यासकांना होईल– आणि ती हळूहळू होत आहे- तेव्हा या क्षेत्रात राजवाड्यांनी करून दाखविलेल्या कर्तृत्वाची यथार्थ कल्पना येऊन त्यांच्या ग्रंथाचे महत्त्व विद्वानांस अधिकाधिक पटत जाईल यात मुळीच शंका नाही. सध्या आपल्या या ‘जुन्या ठेवण्या’ वर काहीसे उपेक्षेचे सावट आले आहे, ही गोष्ट मात्र खरी. हे सावट दूर व्हावे व या प्रतिभावान्‌ भाषाक्ास्रज्ञाचे तेज पुन्हा उठून दिसावे हा प्रस्तुत संपादनामागील एक हेतू आहे.

    Digital Book

    Original price was: ₹90.00.Current price is: ₹0.00.
  • -100% नामदेव गाथा

    नामदेव गाथा

    0

    श्रीभक्‍त शिरोमणी संत नामदेव महाराजांची भक्‍तिज्ञाननिष्ठा आणि अपूर्व व्यक्तिमत्त्व

    महाराष्ट्रीय संतमंडळींत श्री नामदेव महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांची श्रीविठ्ठलेशावरील भक्‍ती निस्सीम व पराकोटीची होती, हे महाराष्ट्रांत सर्वश्रुत आहे. श्रीज्ञानराज माउलींनी महाराष्ट्रांत भागवत धर्माचा अर्थात वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि वारकरी भक्‍तिमार्गाला जे तत्त्वज्ञानाचे भक्‍कम अधिष्ठान दिले त्या संप्रदायाचा प्रचार व प्रसार श्रीनामदेव महाराजांनी येथे धडाडीने केला, हे सर्वांना ठाउकी आहे; पण हा प्रसार त्यांनी केवळ या महाराष्ट्रापुरता सीमित केला नाहीं ; तर तो उत्तर भारतांतही केला. श्रीविठ्ठलाला सोडून पंढरपुराबाहेर तीर्थयात्रेलाही जाण्यास तयार नसलेल्या श्रीविठ्ठलाच्या एकनिष्ठ भक्ताने गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश अशा अनेक प्रांतांतील शहरांत व खेड्यांत भागवत धर्माची पताका फडकावली ; एवढेच नव्हे तर आपल्या उत्तर आयुष्यांत ‘पंजाब’ ही आपली कर्मभूमी ‘ व दीड तपाहून अधिक काळ तेथे राहून, त्या प्रांतांत व आसमंतातील प्रदेशांत भागवत धर्माच्या “भक्‍ति-ज्ञानाची गंगा” नेऊन परकीय स्वाऱ्या व आक्रमणांनीं होरपळून निघालेल्या जनतेला  “अमृत-संजीवनी” दिली, तेथील जनतेत नवचैतन्य ओतले आणि स्वधर्म रक्षणाकरिता सिद्ध राहण्याची केवढी व कशी तयारी केली, याची महाराष्ट्रांत घ्यावी तेवढी दखल अद्यापिही घेतली नाहीं. पंढरीच्या वाळवंटांतील विठ्ठल नामाचा गजर आणि भागवत धर्माच्या “ भक्ति-ज्ञाना ” चे रहस्य श्रीनामदेव महाराजांनीं उत्तरेतही कसे गाजविले, हे कळून येते ; पण याचा उद्घोष महाराष्ट्रांत जितका व्हावा तितका अद्यापि झालेला नाहीं. ती माहिती व श्रीनामदेव महाराजांचे संपूर्ण ‘व्यक्तिमत्त्व’ व कार्य ‘ आपल्यास येथे थोडक्यात पाहावयाचे आहे.

    श्रीपुंडलिक रायांनीं श्रीविठ्ठलाला विटेवर उभे केले; त्या दैवताचा संप्रदाय व वारी श्रीज्ञानदेव महाराज व श्रीनामदेव महाराज यांच्या उदयापूर्वी सुमारे दोनशे-तीनशे वर्षे तरी असावी असे इतिहास संशोधकांचे मत आहे. त्यांच्यापूर्वी श्रीमदाधशंकराचार्य यांनी एक “ श्री पांडुरंगाष्टक ” लिहिले आहे; ते सर्वजन प्रसिद्ध आहे. त्याचेळी आजच्या संप्रदायाची शान, मान व प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी महानुभाव व लिंगायत पंथही आपल्या संप्रदायाचा प्रचार करीत होते. ते दोन्हीही पंथ अवैदिक असल्याने व वैदिक तत्त्वज्ञानाची त्यांना बैठक नसल्याने शिवाय महानुभाव पंथांत त्यांच्या लिपीची दुर्बोधता व विचाराची गुप्तता असल्याने जनमानसावर त्यांची छाप पडत नसे. हेमाद्री, रोप देवासारखी पंडित मंडळी संस्कृत धर्मग्रंथावर संस्कृत भाषेतच टीका करीत अगर ग्रंथरचना करीत ; ह्यामुळें प्राकृत जनांना त्याचा काही उपयोग नव्हता. आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारा व जनमानसांत चैतन्याचा संचार करणारा असा जोमदार पंथ उदयास आला नव्हता; ही उणीव भरून काढणारा “भागवत धर्माच्या भक्ति-ज्ञानाचा दीप श्रीसंत ज्ञानदेव आणि श्रीसंत नामदेव यांनी उजळला आणि जनतेला अंधारातून प्रकाशात-ज्ञान प्रकाशात आणिले.” 

    Original price was: ₹420.00.Current price is: ₹0.00.