• -100% बहिणाईची गाणी एक अभ्यास

    बहिणाईची गाणी एक अभ्यास

    0

    एका अशिक्षित स्त्रीची गांवळळ भाषेतील गाणी म्हणून कित्येक वर्षे बहिणाईंची कविता उपेक्षितच राहिली. पण देह कष्टांत बुडालेला असताना स्वतःच्या नश्निबी आलेले वैधव्य, वडिलमुलाचे अपंगत्व आणि एकुलत्या एका लाडक्या मुलीला सासरी असणारा जाच या तिहेरी दुःखाचा सलही उरी दडपावा लागे. या कष्टांवर आणि दुःखावर उतारा म्हणजे त्यांच्या काव्याने त्यांना दिलेली आयुष्यभराची साथ! कणखर आत्मविश्वासाने जीवनांतील समर प्रसंगांशी त्यांनी दिलेली टक्कर हे त्यांचे लौकिक कर्तृत्व तर खरेच पण निर्मितीची यत्किंचितही जाण नसता त्यांनी चिरंजीव केलेले त्यांचे काव्य हे त्यांचे त्याहूनही मोठे अविनाशी असे वाड्मयीन कर्तृत्व होय. केवळ कर्तव्य

    बुद्धीने त्यांनी व्यावहारिक कर्तृत्व गाजविले तद्वतच केवळ विरंगुळा म्हणून त्यांचे काव्य निर्माण झाले. त्यांच्या कविता संग्रहाची प्रथमावृत्ती प्रसिद्ध झाली, तीही त्यांच्या मृत्यूनंतर. म्हणजेच ज्या सहजपणाने त्यांची कविता जन्मली, त्याला कर्तृत्वाच्या अहंकाराचा हलकासाही स्पर्श न होता ही निसर्गकन्या आपला अमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवून अनंतात विलीन झाली.

    Original price was: ₹150.00.Current price is: ₹0.00.
  • -100% रामजोशी

    लोककवी शाहीर रामजोशी

    0

    रामजोशी म्हणजे परस्पर विरोधी प्रवृत्तींचा मनोज्ञ संगम. 

    असा संगम फारच थोड्या लोकांच्या ठायी झालेला दिसतो. त्यांची डफावर दणकट थाप देणारी बोटे तितक्‍याच नजाकतीने वीणेच्या ताराही छेडीत असत. झाहीर आणि कीर्तनकार, व्युत्पन्नता आणि पाचकळपणा, गंभीरता आणि पोरकटपणा, भोगलोलुपता आणि त्याग, श्रृंगार आणि वैराग्य या सार्‍या गोष्टी रामजोशींच्या व्यक्तीमत्वात एकवटलेल्या दिसतात. पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य यांना जोडणारा रामजोशी हा महत्त्वाचा दुवा आहे.

    जगण्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगावा या वृत्तीने रामजोशींनी आयुष्याकडे पाहिले.  शृंगारकविता जितक्या तन्मयतेने त्यांनी लिहिली तज्ञाच उत्कटतेने उपदेशपर कविताही निर्माण केली. मराठी भाषेत रचना करतानाच त्यांच्या लेखणीने संस्कृतभाषेचा प्रदेशही पाहिला.  संस्कृत, मराठी,  कानडी, हिंदी भाषेचा वापर करून लावणी रचण्याचे चातुर्य त्यांनी दाखविले.  शीघ्रकवित्व आणि समयसूचकता हे दोन गुण त्यांच्याजवळ होते. मोरोपंतावर त्यांचे जितके प्रेम होते तितकेच घोंडीवर देखील होते.

    गिरीचा व्यंकटेश त्यांना जितका प्रिय होता. तितकाच बार्शीचा भगवंतदेखील प्रिय होता. पंढरीचा पांडुरंग त्यांचा प्रेमविषय होता. तशीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीवरही त्यांचे प्रेम होते. शिवशक्तीची उपासनाही कमीअधिक प्रमाणात त्यांनी केलीच होती. आणि तरीही इतक्या परस्परविरोधी प्रवृत्तींचा संगम ज्यांच्या व्यक्तीमत्वात होता, त्या कविरायांची कविता ही अस्सल मराठमोळी कविता आहे. हे लक्षणीय आहे.

    Digital Book

    Original price was: ₹150.00.Current price is: ₹0.00.
  • -100% पठ्ठे बापुराव

    लोकशाहीर पठ्ठे बापूराव

    0

    ज्या काळात रंजन आणि प्रबोधन लोककलाच करत, त्या काळी लोकसंस्कृती आणि लोकजीवनाला उत्साहवर्धित प्रेरणा देण्याचे आत्यंतिक महत्त्वाचे कार्य तमाशा या मराठामोळ्या लोककलेने केले आहे. खेड्यापाड्यांतील वर्षभराच्या शिणलेल्या, मरगळलेल्या लोकजीवनाला एक नवे चैतन्य लाभे. या लोककलाकारांनी, लोकशाहिरांनी सामाजिक स्तरावर सांस्कृतिक जडणघडण केली आहे. पेशवेकालीन शाहिरांच्यानंतर तमाशा कला मंदावली होती; पण पठ्ठे बापूरावांसारखा शीघ्रकवी या कलेची ब्रत म्हणून सेवा करायला लागल्यानंतर त्यांच्या तमाशांनी अवघ्या महाराष्ट्राला वेडे केले. त्यांनी तमाशा कला कळसाला नेऊन पोचवली. त्या कलेला नवा प्राण दिला. तमाशा कला ही त्यांच्या जीवनाचा श्वास बनली होती. त्यांनी लोकरंजनाबरोबर लोकप्रोबधन करण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले. संसार मोडला. उच्चवर्णीय असूनही समाजाची पर्वा बाळगली नाही. गावाने बहिष्कृत केले तरी पठ्ठे बापूरावांनी हाती घेतलेला लोकजागराचा डफ खाली ठेवला नाही. त्यांच्या लेखणीने आणि वाणीने तमाशा कलेला बहर आला. एकदा म्हटलेली लावणी उद्या म्हणायची नाही, लावणी लिहिण्यासाठी एकदा कागदावर लेखणी ठेवली, की लावणी संपल्याशिवाय उचलायची नाही, शिळ्या पैशाचे तोंड पाहायचे नाही अशा या लोकविलक्षण शाहिराच्या लोकविलक्षण प्रतिज्ञा होत्या. संपूर्ण आयुष्यच त्यांनी तमाशा कलेला वाहिले होते. त्यांनी दोन लाखांहून जास्त लावण्या लिहिल्या ही घटनाही जगावेगळी होती.  आजही पठ्ठे बापूरावांच्या गण, गौळणी आणि लावण्यांशिवाय तमाशाची भैरवी होत नाही. 

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.