स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री. यशवंतराव चव्हाण यांनी दिनांक 1 मे, 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात महाराष्ट्र राज्याच्या मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्यकर्त्याच्या कार्यांची उपेक्षा होणार नाही; एवढेच नव्हे तर त्या कार्याची प्रगती व विकास होईल ह्या दृष्टीने पावले निश्चितपणे टाकण्यात येतील; असे आश्वासन दिले होते.

त्याच धोरणानुसार महाराष्ट्राचे साहित्य,इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. त्यानंतर वेळोवेळी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर वेळोवेळी अनेक मान्यवर साहित्यिक व विचारवंतांची नियुक्ती या पदावर झाली.

  • -100%

    कर्मवीर भाऊराव पाटील (काल आणि कर्तृत्व)

    1

    भाऊरावांच्या या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अंतिम हेतू पिळवणूकरहित एकसंध भारतीय समाजनिर्मितीचा होता. जातपात, भेद यांना थारा न मिळता सर्वांना मानव म्हणून शिक्षणाची व प्रगतीची संधी मिळाली पाहिजे. भारतास आत्मनिर्भर, संपन्न राष्ट्र बनविण्याचा तोच मार्ग आहे अज्ञी त्यांची ठाम समजूत होती. परंतु हे ध्येय साध्य करण्यासाठी भाऊरावांनी आपल्या वसतिगृहातील कमकुवत स्तरातील मुलांना, जात-पात, जातिबहिष्कृतता, स्पृद्याकडून होणारी पिळवणूक व जुलूम यापासून निर्भय बनण्यास प्रथम शिकविले. भित्रा मनुष्य बंडखोर बनू शकत नाही. सांप्रदायिकता, जातपात, विवेकशून्य रूढी यांच्या भयापासून मुलांना मुक्त करून त्यांना मुक्त मानव बनविण्याचे भाऊरावांचे तत्त्वज्ञान होते; आणि हे काम परकीय सत्तेच्या भयापासून मुक्त करण्यास पूरक होते.

    महाराष्ट्राच्या बाबतीत ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निरर्थक असल्याचे १९५३ साली त्यांनी पहिल्या महाराष्ट्र सामाजिक परिषदेत जाहीरपणे सांगितले होते. याची जाण भाऊरावांनी सन १९२२-२३ साली ‘कुऱ्हाड’ साप्ताहिकासाठी प्रबोधनाच्या पहिल्या प्रस्तावनेत स्पष्ट केली होती. सन १९५८ साली सातारच्या जिल्हा परिषदेने भाऊरावांना त्याच्या आजारपणाच्या स्थितीत मानपत्र देऊन सत्कार केला, त्यावेळी भाऊराव म्हणाले, ब्राह्मण समाजावर तरुणपणाच्या अविचारी अवस्थेत त्या काळास अनुसरून त्यांनी टीका केली; त्याबद्दल त्यांना पश्चाताप होतो आहे. आता हा वाद गाडून टाकला पाहिजे.” आंतरजातीय विवाह हा वाद मोडण्यास पूरक आहे अशी त्यांची धारणा असल्याने अश्या लग्नसमारंभास भाऊराव स्वतः हजर राहून वधूवरांना आक्रीर्वाद देत. आचार्य अत्र्यांच्या विवाहास ते हजर होते. कारण अत्र्यांचा तो विवाह आंतरजातीय होता.

    Digital Book 

    Original price was: ₹23.00.Current price is: ₹0.00.
  • -100% छत्रपती

    छत्रपती शिवाजी महाराज

    1

    निवेदन

    लोकोत्तर व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो कधीही पुरेसा आणि समाधानकारक असत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अशा व्यक्तींपैकी एक होते.

    शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांनी घडविलेला इतिहास हा केवळ मराठी भाषा असलेल्या अभ्यासकांचा-सृजनशील लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला नाही तर इतर भारतीय भाषांतील अभ्यासकांच्या, लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला आहे.

    अशा या लोकोत्तर पुरुषाच्या जीवनाचा व त्यांनी घडविलेल्या इतिहासाचा मोजक्या पण नेमक्या  शब्दांत परिचय व्हावा म्हणून श्रीशिवाजी महाराजांवर एक छोटेखानी चरित्रग्रंथ लिहून देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने डॉ. प्र. न. देशपांडे यांना केली. “शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली; न्यायदानात निःस्पृहता दर्शविली; गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱयांना मुलाहिजा न ठेवता समज दिली; पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले; सर्व धर्माना समान लेखले; साधुसंतांचा यथोचित आदर केला; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱया महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरुष होता.” हा या चरित्रग्रंथाचा डॉ. प्र. न. देशपांडे यांनी केलेला समारोप वाचल्यानंतर त्यांनी आमची विनंती सन्मानित केल्याचे स्पष्ट होते. डॉ. प्र. न. देशपांडे यांचे आम्ही आभारी आहोत.

    – रा. रं. बोराडे

    मुंबई अध्यक्ष

    दि. १६ जुलै, २००२ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

    Digital Book

    Original price was: ₹45.00.Current price is: ₹0.00.
  • -100%

    ज्ञानेश्वरीची प्रस्तावना आणि ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण

    1

    संपादकीय निवेदन

    इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांची “ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरींतील मराठी भाषेचे व्याकरण’ हे दोन ग्रंथ इ. स. १९०९ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर इ. स. १९६० साली महाराष्ट्र राज्यश्ञासनाने त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’चे पुनर्मुद्रण केले; पण ते करताना त्यांनी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना वगळली. वरील दोन्ही प्रकरणे, म्हणजे प्रस्तावना व व्याकरण, मराठी भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला बहुमोल असून ती दुर्मिळ झाल्याने]त्यांची एक संपादित आवृत्ती काढावी या हेतूने प्रस्तुत ग्रंथ प्रसिद्ध होत आहे. राजवाड्यांच्या मूळ प्रबंधांना तळटीपा, विषयसूची किंवा शब्दसूची यांची जोड नाही. ती येथे देऊन त्यांचे प्रबंध अधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्या प्रस्तावनेची व व्याकरणाची वैशिष्ट्ये सांगणारा एक विवेचक प्रस्तावही या जोडग्रंथास जोडला आहे. या कामी ‘साहित्य संस्कृती मंडळ’ने पुढाकार घेऊन हा ग्रंथ स्वतःचे प्रकाशन म्हणून प्रसिद्ध केला यासाठी मी ‘मंडळा’चा आभारी आहे.

    –  शं. गो. तुळपुळे , पुणें, ६ जून १९७८

    संपादकीय प्रस्तावना  राजवाडे-ज्ञानेश्वरी

    इतिहासाचार्य विश्वनाथ काश्लीनाथ राजवाडे यांनी त्यांना मराठवाड्यात बीड-पाटांगण येथे मिळालेली ज्ञानेश्वरीची पोथी तिला एक विस्तृत प्रस्तावना लिहून इ. स. १९०९ (शके १८३१) मध्ये प्रसिद्ध केली. त्याबरोबरच “ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण” हा आपला प्रबंधही त्यांनी त्याच वर्षी प्रसिद्ध केला. राजवाड्यांची ही ज्ञानेश्वरीची ‘प्रस्तावना’ व तिचे ‘व्याकरण’ त्यांच्या बुद्धिमत्तेची व व्यासंगाची साक्ष देत असून मराठी भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला त्यांचे वरील दोन्ही प्रबंध अमोल ठरले आहेत. ते प्रसिद्ध झाल्याला आता सत्तर वर्षे होत आली असून खुद्द राजवाड्यांना जाऊनही पन्नास वर्षे झाली आहेत. या कालावधीत मराठी भाषेचा अभ्यास पुष्कळच पुढे गेलेला असला तरी अजूनही राजवाड्यांची ‘ज्ञानेश्वरीची प्रस्तावना’ व त्यांचे ‘व्याकरण’ या जोडसाधनांचा उपयोग केल्यावाचून अभ्यासकाचे व संशोधकाचे पाऊल पुढे पडत नाही, इतके या दोन प्रबंधांचे महत्त्व आहे. आधुनिक भाषाभ्यासकांचा एक वर्ग राजवाड्यांच्या वरील कृतीकडे काहीशा उपेक्षेने पहात असतो हे खरे असले तरी ही परिस्थिती फार काळ टिकेल असे वाटत नाही. वर्णनात्मक (Descriptive)भाषाशास्त्राबरोबर ऐतिहासिक (Historical) भाषाशास्त्र म्हणून काही असते याची जाणीव जेव्हा आधुनिक अभ्यासकांना होईल– आणि ती हळूहळू होत आहे- तेव्हा या क्षेत्रात राजवाड्यांनी करून दाखविलेल्या कर्तृत्वाची यथार्थ कल्पना येऊन त्यांच्या ग्रंथाचे महत्त्व विद्वानांस अधिकाधिक पटत जाईल यात मुळीच शंका नाही. सध्या आपल्या या ‘जुन्या ठेवण्या’ वर काहीसे उपेक्षेचे सावट आले आहे, ही गोष्ट मात्र खरी. हे सावट दूर व्हावे व या प्रतिभावान्‌ भाषाक्ास्रज्ञाचे तेज पुन्हा उठून दिसावे हा प्रस्तुत संपादनामागील एक हेतू आहे.

    Digital Book

    Original price was: ₹90.00.Current price is: ₹0.00.